Blog
No.2025/053.
Date:
-22nd, February,2025.
मित्रांनो,
1960-80 या दरम्यान जन्माला
आलेल्या लोकांना,अमीन सयानी माहित नाही असे होऊ शकत नाही.
“भाईयो और बहनो” अशा मृदु संबोधनाने ते रेडियो रसिकांना साद घालीत.मला आठवतंय
एखाद्या वेळेस लहानपणी बिनाका गीतमाला लावायचं विसरलो,तरी
विशेष फरक पडत नसे.कारण बाजूच्या सगळ्याच घरांमधून बिनाका
गीतमाला लागलेली असायची.त्या अमीन सयानी यांचे मागच्या वर्षी 20 फेब्रुवारीला वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.या
सोनेरी आवाजाच्या जादूगाराला पहिल्या स्मृती दिनी,विनम्र
श्रद्धांजली वहाण्यासाठीचा हा ब्लॉग.
सविस्तर:
अमीन सयानी यांचा जन्म 21
डिसेंबर, 1932 ला झाला.अमीन सयानी यांची ओळख
त्यांचे भाऊ हमीद सयानी यांनी ऑल इंडिया रेडिओ, बॉम्बे
(आताचे मुंबई) येथे करून दिली.अमीन यांनी दहा वर्षे इंग्रजी कार्यक्रमात सहभागी
झाला.पुढे त्यांनी ऑल इंडिया रेडिओ लोकप्रिय करण्यात मदत केली.अमीन सयानी यांचा
भूत बंगला,तीन देवियां,बॉक्सर आणि कतल
यांसारख्या अनेक चित्रपटांत देखील सहभाग होता. या सर्व सिनेमांमध्ये ते कोणत्या ना
कोणत्या कार्यक्रमात निवेदकाच्या भूमिकेत दिसले.
अमीन सयानी यांनी त्यांची आई कुलसुम सयानी यांना महात्मा गांधींच्या
सूचनेनुसार नव-साक्षरांसाठी पाक्षिक नियतकालिकाचे संपादन, प्रकाशन आणि
छापण्यात मदत केली.1951 पासून त्यांनी ऑल इंडिया रेडिओ,
1970 पासून ऑल इंडिया रेडिओची व्यावसायिक सेवा आणि 1976 पासून विविध परदेशी स्टेशन्स असे मिळून अमीन सयानी यांनी 54,000 हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि 19,000 स्पॉट्स/जिंगल्सची
निर्मिती केली आहे.या बद्दल त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
1952 पासून त्यांनी CIBACA
(पूर्वी BINACA) गीतमाला मुख्यतः रेडिओ
सिलोनवर आणि नंतर विविध भारती (AIR) वरून - एकूण 42 वर्षांहून अधिक काळ प्रसारित केले.ते जेव्हा बिनाका गीतमाला या
कार्यक्रमाचे संचालन करत असतं तेव्हा ते अतिशय मनोरंजकपणे सादर करत. और अगली पादान
पर है ... असं म्हटल्यावर प्रत्येक रसिकाचे कान पुढील गाण्याचे बोल ऐकण्यासाठी
आतूर होत.दर बुधवारी हा कार्यक्रम प्रसारित केला जात असे.कोलगेट सिबाका गीतमाला
म्हणून 2 वर्षांसाठी विविध भारतीच्या नॅशनल नेटवर्कवर
प्रसारित केले गेले.कॅसेट, एलपी आणि सीडीवर अनेक ऑडिओ
फीचर्सची निर्मिती केल्यानंतर, सयानी सीडीवर त्याच्या
फ्लॅगशिप रेडिओ शो गीतमालाचा असामान्य रेट्रोस्पेक्ट (सारेगामा इंडिया
लिमिटेडसाठी) निर्मिती करत होते. या मालिकेचे नाव "गीतमाला की छाओं में"
असे आहे, ज्यातील 40 खंड (प्रत्येकी
पाच सीडीच्या पॅकमध्ये) आधीच तयार आणि रिलीज केले गेले आहेत.खंडांची भारतात आणि
परदेशात चांगली प्रशंसा झाली आहे.
सन्मान आणि
पुरस्कार:
अमीन सयानी यांना 2009 मध्ये भारत सरकारचा चतुर्थ सर्वोच्य पुरस्कार “पद्मश्री”ने सन्मानित
करण्यात आले.याशिवाय त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले।
1. इंडिया रेडिओ फोरमसह लूपफेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड
इंडस्ट्रीकडून लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड.
2. रेडिओ मिर्ची (टाइम्स ग्रुपचे एफएम नेटवर्क) कडून कान हॉल ऑफ फेम
पुरस्कार.
3. ॲडव्हर्टायझिंग क्लब,बॉम्बे द्वारे गोल्डन ॲबी
शताब्दीच्या उत्कृष्ट रेडिओ मोहिमेसाठी ("बिनाका/सिबाका गीतमाला").
4. इंडियन ॲकॅडमी ऑफ ॲडव्हर्टायझिंग फिल्म आर्ट (IAAFA) कडून हॉल ऑफ फेम पुरस्कार.
5. पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड.
6. इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टायझर्स (ISA) कडून सुवर्ण
पदक (1991) श्री के.आर. नारायणन, भारताचे
तत्कालीन उपराष्ट्रपती.
7. 2007 मध्ये त्यांना नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित हिंदी भवनाने "हिंदी रत्न
पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
मृत्यू
अमीन सयानी यांचे 20 फेब्रुवारी,2024 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन
झाले. ते 91 वर्षांचे होते. सयानी यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका
आला.त्यानंतर त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात नेले, जिथे त्यांनी
अखेरचा श्वास घेतला. सोनेरी आवाजाच्या जोरावर ज्याने,अगणित रसिकांच्या हृदयावर
राज्य केले,त्या आवाजाच्या जादूगाराला माझी विनम्र श्रद्धांजली.
समारोप:
आवाजाच्या जोरावर आपले करियर घडविणारे
असे फार कमी लोकं आहेत.भलेही संगीताच्या दुनियेत असे बरेच असतील. पण केवळ संभाषणातील
आवाजाने लोकप्रिय फार कमी झाले.त्यात महाभारतात “मी समय हूं” असं धीरगंभीर आवाजात म्हणणारे
हरिष भिमानी,हिन्दी क्रिकेट समालोचक सुशील दोषी,आकाशवाणीवर मराठी बातम्या देणारे “दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या
देत आहे”. असे काही बोटावर मोजण्याइतकेच.आणि हो हिन्दी चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ
बच्चन.पण एकाच प्रोग्रामला आवाज देऊन अनेक वर्षे तो स्वतःलाच नाही तर त्या कार्यक्रमाला
रेडियोवर लोकप्रियता मिळवून देणारे अमीन सयानी ग्रेटच.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग
येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
ते मस्तच होते
ReplyDelete