Blog No. 2024/ 083.
Date: 27th, April 2024.
मित्रांनो,
या वेळेसच्या
निवडणुका बऱ्याच कारणांनी गाजत आहेत.पहिली गोष्ट ही की बहुतेक पक्षांना या वेळेस आपले
उमेदवार निश्चित करण्यास वेळ लागतोय. सातचरणांमद्धे निवडणूक असल्याने शेवटच्या चरणात
होणाऱ्या बऱ्याच मतदारसंघासाठी अजून बऱ्याच ठिकाणी कोण उमेदवार आहे,अजून हे निश्चित
झालेले नाही.पहिल्या फेरीत इंडी आघाडी थोडा लीड घेत आहे,असे दिसत असतांना अचानक काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते आणि एकेकाळी गांधी घराण्याचे जवळचे विश्वासू असलेले सॅम पित्रोदा यांनी
नेहमीप्रमाणे एक वादग्रस्त विधान करून कॉंग्रेस पक्षाला पर्यायाने इंडी आघाडीला दोन
पावले मागे खेचले आहे.आज त्यांच्या या वादग्रस्त विधानाबद्दल आणि एकूणच सॅम
पित्रोदा हे कॉंग्रेसला नेहमीच कसे त्रासदायक ठरले आहेत. हे बघू या.
सविस्तर:
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एकेकाळी
गांधी घराण्याचे जवळचे विश्वासू असलेले सॅम पित्रोदा हे राजकीय वादांसाठी अनोळखी
नाहीत आणि अनेकदा वादग्रस्त किंवा संवेदनशील मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या
वक्तव्याने वाद निर्माण झाले आहेत आणि ते वाद त्यांच्याच पक्षासाठी त्रासदायक ठरले
आहेत.पित्रोदा यांनी आपल्या ‘अमेरिकेकडे वारसा कर आहे’ या टिप्पणीने आपल्याच पक्षाला
अडचणीत आणले आहे. ही संधी भारतीय जनता पक्षाने सध्या सुरू असलेल्या लोकसभा
निवडणुकांमध्ये काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी प्रभावीपणे कॅश केली आहे.
भारतीय ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम
पिटोर्डा यांनी पंतप्रधान मोदींच्या 'संपत्तीचे पुनर्वितरण' या टिप्पणीवर भाष्य केले की युनायटेड स्टेट्स (यूएस) ची वारसा कर ही संकल्पना
आहे,याचा अर्थ एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती असेल तर त्याच्या पश्चात संपत्तीपैकी 55% संपत्ती सरकारला हस्तांतरित केली जाते.आणि उरलेली 45% त्यांच्या मुलांकडे जाते.
काँग्रेसने पित्रोदांच्या “मतां”पासून
त्वरीत स्वतःला दूर केले असले तरी,हे विधान जो तोटा करायचा ते करून गेले.पंतप्रधान
मोदींनी या गोष्टीचा फायदा घेत, “जिंदगी के साथ भी, जिंदगी
के बाद भी” काँग्रेसने लोकांना लुटण्याचे ठरविले
असल्याचा थेट हल्ला, काँग्रेसवर केला.भारतीय लोक आपल्याला वारश्याने मिळणाऱ्या संपत्ती
बद्दल किती संवेदनशील आहेत,हे कदाचित पित्रोदांना माहित नसेल. पण पित्रोदा यांनी
स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला तेल लावण्याची ही पहिलीच वेळ नाही आणि त्यांच्या
राजकीय कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास केल्यास हे 81
वर्षीय राजकारणी असंख्य मोठ्या वादांच्या केंद्रस्थानी कसे राहिले याचा पुरावा
मिळतो.
2019 च्या निवडणुकीपूर्वी पित्रोदा म्हणाले होते, “मध्यमवर्गीय लोकांनी स्वार्थी
होऊ नये”:
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी,एका टीव्ही मुलाखतीदरम्यान,पित्रोदा
म्हणाले होते की,
मध्यमवर्गीयांनी गरीब कुटुंबांना किमान उत्पन्नाची हमी
देण्यासाठी अधिक कर भरावा,त्यांनी “स्वार्थी” होऊ नये असे सांगितले
होते.या विधानामुळे काँग्रेस पक्षाला मोठा त्रास झाला.शेवटी,काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते पी. चिदंबरम यांना स्पष्टीकरण द्यावे लागले की,काँग्रेस सत्तेत परत आल्यास
मध्यमवर्गावर अतिरिक्त कराचा बोजा पडणार नाही.त्या नंतर पित्रोदा पाकवर बोलले.त्यांनी
बालाकोट एअरस्ट्राईकला विरोध केला
बालाकोटमधील आयएएफ स्ट्राइकवर,त्यांनी
पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल पित्रोदा यांच्यावर राजकीय समुदायाकडून तीव्र
टीकाही झाली. पित्रोदा म्हणाले, “मुंबईतही हल्ला झाला होता.त्यानंतर
आम्ही प्रतिक्रिया देऊ शकलो असतो आणि आमची विमाने पाठवली असती. पण तो योग्य
दृष्टिकोन नाही. काही लोकांनी इथे येऊन हल्ले केले म्हणून,त्या राष्ट्रातील
प्रत्येक नागरिकाला दोषी ठरवले जाणे चुकीचे आहे.”
पित्रोदा यांनी जेव्हा शीखविरोधी दंगलीवर 84 मे हुआ तो हुआ म्हणाले :
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जेव्हा भाजपने दावा केला
की 1984 च्या शीखविरोधी दंगलीसाठी “सूचना” राजीव गांधींकडून आल्या होत्या, तेव्हा माजी पंतप्रधानांचे निकटवर्तीय पित्रोदा यांनी आरोप नाकारले.परंतु ते म्हणाले, “अब क्या है '84 का? आपने क्या किया 5 साल में,
उसकी बात करिये. ’84 में हुआ तो हुआ.आपने क्या
किया?" पित्रोदा यांनी या वक्तव्याबद्दल नंतर माफी मागितली असली
तरी, या वादग्रस्त विधानाने काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदारपणे काम केले.
जेव्हा पित्रोदा राममंदिर बांधकामावर म्हणाले, 'मंदिरे रोजगार निर्माण करणार नाहीत':
जून 2023
मध्ये, अमेरिकेतील एका कार्यक्रमात, पित्रोदा म्हणाले की, भारतात कोणीही महागाई,
रोजगार आणि शिक्षण यावर बोलत नाही आणि फक्त राम, हनुमान आणि मंदिरावर चर्चा करतो. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत
त्यांनी ही टीका केली.ते म्हणाले "जेव्हा संपूर्ण देश
राम मंदिर आणि रामजन्मभूमीवर टांगलेला असतो, तेव्हा मला त्रास होतो.माझ्यासाठी
धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे आणि राष्ट्रीय समस्या म्हणजे शिक्षण, रोजगार,
वाढ,
अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्य,
पर्यावरण आणि प्रदूषण.पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही,” हे खरे असले तरी या विधानाला कसं वापरायचं,हे भाजपने ठरविलं आणि त्याचा योग्य वापर
लोकभावनांना जागृत करण्यासाठी केला.
समारोप:
कधी कधी कळतं
नाही की हे लोक आपल्या पक्षासाठी काम करतात की दुसऱ्या पक्षासाठी.भारतीय जनता पार्टीत
देखिल अशा वाचाळवीरांची कमी नाही.पण त्यामुळे होत काय की मुद्दा भलतीचकडे भटकतो. राजकारण
हा देखिल एक बुद्धिबळाचा खेळ आहे.एक चाल चुकली की गेम निसटतो आणि अशा अडचणीत आणणाऱ्या
वक्तव्याने तर अक्षरक्ष: आपलाच गेम होण्याची पाळी पक्षावर येते.म्हणून जास्त न बोलणारे
बरे.
तुम्हाला आजचा
ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
Entertaining blog.. negative or self goal manje hech asave
ReplyDelete