Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

ओ माही ओ माही एक सुरेख गीत

Blog No. 2024/ 085.   

Date: 29th, April 2024.

मित्रांनो,

            बऱ्याच दिवसांपासून एका गीताने माझे लक्ष वेधून घेतले होते. शाहरुख खान आणि तापसी पन्नू अभिनीत “डंकी” (Dunki) या चित्रपटातील “ओ माही ओ माही” हे अरीजित सिंगने गायलेले हे गीत प्रीतम यांनी संगीत बद्ध केले आहे.खूप सुरेख आशयघन शब्दरचना,सुंदर चाल आणि सुरेल स्वर यांचे अनोखे संयुग बऱ्याच दिवसांनी अनुभवास मिळाले.ऐकू या हे गाणे आणि त्याचा स्वैर अनुवाद, आजच्या ब्लॉगमध्ये. 

सविस्तर

यारा तेरी कहानी में, हो जिक्र मेरा

कहीं तेरी खामोशी में, हो फिकर मेरा

मराठी अनुवाद

प्रेमा,तुझ्या कहाणीत कुठेतरी माझा उल्लेख असू दे.

तुझ्या मौनात माझी काळजी दिसू दे.  

हिन्दी  

रुख तेरा जिधर का हो, हो उधर मेरा.

तेरी बाहों तलक ही है, ये सफ़र मेरा

मराठी अनुवाद

तुझी जिकडे नजर असेल तिकडेच माझी असू दे

माझा जिवनाचा प्रवास केवळ तुझ्यापर्यन्त असू दे  

हिन्दी

ओ माही ओ माही,ओ माही ओ माही

ओ माही ओ माही. ओ माही ओ माही

मेरी वफ़ा पे, हक हुआ तेरा

ओ माही माही वे

मराठी अनुवाद

माझ्या प्रेमावर तुझा अधिकार आहे.

हे प्रेमा.   

ओ माही ओ माही,ओ माही ओ माही

ओ माही ओ माही,ओ माही ओ माही

हिन्दी

लो मैं कयामत तक हुआ तेरा,

लो मैं कयामत तक हुआ तेरा

मराठी अनुवाद

मी जगाच्या अंतापर्यंत केवळ तुझाच आहे,

मी जगाच्या अंतापर्यंत केवळ तुझाच आहे.   

हिन्दी

बातों को बहने दो,

बाहों में रहने दो,

है सुकून इनमे

मराठी अनुवाद

प्रेमाच्या कथा अशा पसरू दे,

मला तुझ्या बाहूमध्ये असू दे,

कारण त्यात समाधान आहे.    

हिन्दी

रास्ते वो बेगाने,

झूठे वो अफ़साने,

तू ना हो जिनमे.

मराठी अनुवाद

तू जिथे नाहीस,

ते सर्व मार्ग माझ्या साठी अज्ञात आहेत,

आणि त्या सर्व कहाण्या माझ्या साठी खोट्या आहेत.  

हिन्दी

हो थोड़ी उमर है,

प्यार ज़्यादा मेरा,

कैसे बता ये,सारा तेरा होगा

मराठी अनुवाद

हे जिवन छोटे आहे,

पण माझे प्रेम अपार आहे,

कसं सांगू हे सगळं तुझं आहे.   

हिन्दी

मैंने मुझे है, तुझको सौपना.

मराठी अनुवाद

मला स्वतःला तुझ्या स्वाधीन करायचे आहे.

हिन्दी

आहों पे बाहों पे,राहों पनाहों पे,

आहों पे बाहों पे, साहों सलाहों पे,

मेरे इश्क पे,हक हुआ तेरा.

मराठी अनुवाद

माझ्या हुंकारावर, बाहूवर,आधारावर,    

माझ्या हुंकारावर, बाहूवर,यशावरच काय,

माझ्या प्रेमावर तुझाच अधिकार आहे.

ओ माही माही वे

ओ माही ओ माही

ओ माही ओ माही, ओ माही ओ माही,ओ माही ओ माही.

समारोप:

            सुरेल,सुंदर गाण्यांचे युग संपले नाही. मधून मधून खूप छान गाणी कानी पडत असतात. फक्त आमच्या वेळेस चांगलं होतं किंवा जास्त चांगलं होतं,हा आग्रह सोडला पाहिजे, हेका सोडला पाहिजे,हेच खरे.       

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. Frankly I only read the Marathi version. The song is sweet, beautiful and impact and touches your inner soul.

    ReplyDelete
  2. छान सांगितला आहे अर्थ.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...