Skip to main content

Posts

Showing posts from March, 2024

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप

  Blog No. 202 4 /   057.    Date:31 st , March 202 4 . मित्रांनो,             भारताच्या अंतर्गत कारभाराबाबत टिपणी करणे,हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे? अशा थाटात अनेक गोष्टी नेहमीच अमेरिका असो, संयुक्त राष्ट्र संघ यांच्या कडून होत असतात. या मागे खोडसाळपणा तर असतोच,पण त्यामागे राजकीय हेतु   देखिल असतोच, हे लक्षात घ्यायला हवे.या विषयाला समर्पित आहे आजचा ब्लॉग.     सविस्तर             दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर ' भारतातील राजकीय अशांतता ' या बाबीवर लक्ष वेधताना प्रवक्त्याने ही टिप्पणी केली.स्टीफन दुजारिक , महासचिवांचे प्रवक्ते , यांनी व्यक्तींच्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्यासह त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे यावर त्यांनी जोर दिला. ...

व्यायाम, सकाळी की संध्याकाळी, केव्हा करावा?

Blog No. 202 4 /   056.    Date:30 th , March 202 4 .   मित्रांनो,             आजकालचे व्यग्र,धकाधकीचे जिवन,ताण-तणाव,बदललेली आहार शैली यामुळे व्यायाम हा आवश्यकच नव्हे गरजेचा झाला आहे.नोकरीचे सुद्धा काही वेळापत्रक वगैरे सुद्धा राहिलेले नाही.त्यामुळे व्यायाम नेमका केव्हा करायचा,सकाळी की संध्याकाळी हा प्रश्न पडतो. व्यायाम सकाळी करणे फायदेशीर आहे की संध्याकाळी. या साऱ्या प्रश्नांची उकल आजच्या ब्लॉग मधून आपण करणार आहोत.   सविस्तर             व्यायामाची सर्वोत्तम वेळ, मग ती सकाळची असो किंवा संध्याकाळची हे वैयक्तिक प्राधान्ये , वेळापत्रक आणि शारीरिक घटकांवर अवलंबून बदलू शकते.तुमच्यासाठी कोणता वेळ सर्वोत्तम असू शकतो हे ठरविण्यात मदत करण्यासाठी येथे काही मुद्दे मांडत आहे.    सकाळच्या व्यायामाचे फायदे: 1 चयापचय प्रक्रिया वाढवते: सकाळी व्यायाम केल्याने तुमची चयापचय प्रक्रिया लवकर सुरू होते , ज्यामुळे तुम्हाला दिवसभरात अधिक कॅलरी जाळण्यास मदत...

भारत आघाडीची आर्थिक शक्ती बनण्याच्या मार्गावर

  Blog No. 202 4 /   055.    Date:2 9 th , March 202 4 .   मित्रांनो,             बरेच दिवस झाले ब्लॉग लिहिला नाही आणि पोस्ट केला नाही.नुकतीच माझ्या वाचनात,भारताच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.अरविंद पनगरिया,यांची टाइम्स नाऊ समिट 2024 मधील मुलाखत वाचनात आली.त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे की,काही भारतीय आणि जागतिक पातळीवर, भारताच्या विकास क्षमतेबद्दल सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते,त्या लोकांनी आपल्या चष्म्यावर बसलेले धुके आधी तपासून पहावे आणि मग टीका करावी.कारण जो जीडीपी डेटा आहे तो सांख्यिकीशास्त्रज्ञांच्या अतिशय व्यावसायिक एजन्सीजकडून करवून घेण्यात आला आहे. आज याच विषयावर ब्लॉग लिहिला आहे.     सविस्तर             डॉ अरविंद पनगरिया म्हणतात,की आता भारताला थांबवता येणे शक्य नाही,कारण भारत एक आघाडीची शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे.ते पुढे म्हणतात की,भारत, 75 वर्षांहून अधिक काळ लोकशाही टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेल...

दिल्ली सरकारचा अबकारी कर घोटाळा

  Blog No. 202 4 /   054.    Date:2 4 th , March 202 4 .   मित्रांनो,               अंमलबजावणी संचालनालयाने 21 मार्चला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविन्द केजरीवाल यांना अटक केली. मद्य घोटाला प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली.त्यांच्या अटकेचे पडसाद सर्वत्र दिसून आले.हे स्वाभाविक होते. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर निदर्शने केलीत.विरोधी पक्षांनी एक सुरात लोकशाहीची हत्या झाल्याचा गळा काढला.पण यामागची वास्तविकता काय हे कुणी जाणून घेतले नाही किंवा त्यांना जाणून घ्यायचे नाही आणि फक्त वक्तव्ये जाहीर करावयाची असे दिसते. या वर आहे आजचा ब्लॉग.   सविस्तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया , ज्यांच्याकडे अबकारी खाते (विभाग) त्यांनी दिल्लीचे नवीन उत्पादन शुल्क धोरण (२०२१ - २०२२) आणले. या धोरणानुसार दिल्ली सरकारने किरकोळ एमआरपी मद्य क्षेत्रावर जी सरकारची पकड होती,त्यामधून   बाहेर पडण्याचे   ठरविले.उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या उद्देशाने या विधेयकाने खाजगी ...