Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

आधुनिक जीवनशैलीचा आतड्यांवर होणारा परिणाम

 Blog No.2024/034

Date: -19th, February,2024. 

मित्रांनो,

            आपण त्या युगाकडे चाललो आहोत,जिथे पिझ्झाची delivery ड्रोन करतो किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी मेंदूचे काम करण्याचा प्रयत्न करत आहे.पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या शरीरासाठी म्हणा अगदी पोटासाठी आपण सारे करत असतो.त्या पोटातील आतड्यांची आपण काळजी घेतांना दिसत नाही.किंबहुना त्याबाबतीत आपण आजही अगदी अश्मयुगात आहोत असे लक्षात येते. या विषयी वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. 

सविस्तर   

आजचा आधुनिक आहार हाच केवळ आमच्या पचनसंस्थेचा नाश करत नाही तर,अँटिबायोटिक्स, कीटकनाशके आणि तणाव यासारखे इतर अनेक घटक आहेत.जे आतड्याच्या आरोग्यावर परिणाम करतात. आता आपण आहार,प्रतिजैविके, कीटकनाशके आणि तणाव या बद्दल सविस्तर जाणून घेऊ या. 

1. आहार

आपण सारेच जाणता की प्रक्रिया केलेले पदार्थ आतड्यांसाठी चांगले नाहीत.पण  गहू, सोया आणि कॉर्न यासारखी पिके शेतकऱ्यांसाठी सर्वात फायदेशीर आहेत,म्हणून यापासून बनणारी उत्पादने ग्राहकांसाठी त्वरित उपलब्ध होतात.processed food किंवा प्रक्रिया केलेलया पदार्थामध्ये आतड्यांमधील जैवविविधतेला (Biodiversity) ताकद देण्यासाठी आवश्यक असलेले फायबर नसते.आंतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांना पोषक असते,संपूर्ण धान्य, फळे आणि विविध भाज्यांची उपलब्धता,ज्यात बरे करणारे आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.प्रत्येक पिढीच्या आहारात फायबरचे प्रमाण कमी कमी होत आहे आणि याचे दुष्परिणाम होत आहेत.अभ्यासाने असा निष्कर्ष काढला आहे की सरासरी अमेरिकन लोकांनी पिढ्यानपिढ्या खराब आहारामुळे त्यांचे 40% चांगले बॅक्टेरिया गमावले आहेत.खराब आतड्यांसंबंधी आरोग्याचे दुष्परिणाम,भरपूर फळे आणि भाज्यांसह उच्च फायबर आहार घेतल्यास आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे कमी केल्यास अंशतः कमी करणे अजूनही शक्य आहे.   

2. प्रतिजैविक Antibiotics

अँटिबायोटिक्स या आधुनिक औषधांचा एक अतुलनीय असा जीवनरक्षक फायदा आहे.पण, अमेरिकेतील Centre for Disease Control and Prevention (CDC) चा अंदाज आहे की अमेरिकेत डॉक्टरनी लिहून दिलेल्या प्रतिजैविकांपैकी 30% पूर्णपणे अनावश्यक आहेत.आपल्या देशात कमी अधिक हेच प्रमाण असणार आहे.अँटिबायोटिक्स केवळ संसर्गास कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारत नाहीत,तर ते निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेले चांगले बॅक्टेरिया देखील नष्ट करतात.शरीराला बरे होण्यासाठी चार आठवडे ते सहा महिन्यांपर्यंत कालावधी लागतो.तेव्हा एवढ्या वेळात शरीरासाठी आवश्यक असलेले चांगले बॅक्टेरिया किती नाश पावत असतील अंदाज करा.आणि ही औषधे वारंवार घेण्याचा धोका हा की ही पुढे पुढे तर परिणामशून्य होऊ लागतात.अमेरिकेत 80% प्रतिजैविक प्रत्यक्षात पशुधनांना दिली जातात,मानवांना नाही.याचा अर्थ असा नाही की आपण डॉक्टरांनी सांगितलेली अँटीबायोटिक्स घेण्यास नकार द्यावा,परंतु सर्दी झाल्यास डॉक्टरांकडे न जाणे चांगले.तसेच प्राण्यांपासून मिळणारी उत्पादने जसे की मांस,अंडी,दूध इत्यादिचा मर्यादित वापर देखील फायदेशीर होऊ शकतो. 

3. निसर्गापासून अंतर

तज्ज्ञांना असा विश्वास आहे की निसर्गापासून आपला वाढता दुरावा हे देखील आतड्याच्या खराब आरोग्यास कारणीभूत आहे.जेवढे आपण  दैनंदिन जीवनात निसर्गाच्या संपर्कात असू तेवढे चांगले.कारण आपण अधिक नैसर्गिक जीवाणूंच्या संपर्कात असतो.शहरांमध्ये त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आमचा मायक्रोबायोम कमी होतो. मायक्रोबायोम म्हणजे शरीरातील सर्व सूक्ष्मजंतूंचा संग्रह आहे, जसे की जीवाणू, बुरशी, विषाणू आणि त्यांचे जीन्स,जे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात राहतात.हे मायक्रोबायोम रोगांपासून आपले संरक्षण करत असतात. 

4. तणनाशके आणि कीटकनाशके

ग्लायफोसेट सारख्या तणनाशकांची पातळी आपल्या अन्नात आणि आपल्या शरीरात सातत्याने वाढत आहे.ग्लायफोसेट अत्यावश्यक पोषक द्रव्ये रोखून तण नष्ट करत असते,परंतु ते आपल्या आतड्यात देखील अत्यावश्यक पोषक द्रव्ये रोखून धरण्याचे काम करत असते.ते आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या निरोगी जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करते.एमआयटीच्या संशोधकांचा असा विश्वास आहे की ग्लायफोसेटचे जास्त सेवन थेट सेलिआक रोगाशी संबंधित आहे, सेलिआक रोग म्हणजे एक रोगप्रतिकारक स्थिती जिथे लहान आतडे खराब होते आणि ग्लूटेन सहन करू शकत नाही. 

5. तणाव आणि खराब झोप

आतडे आणि मेंदू हे एकमेकांशी जोडलेले असते. दीर्घकाळचा ताण आणि कमी झोप याचा थेट परिणाम तुमच्या पचनावर होतो.तसेच खराब आतडे मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकू शकते.तुमचे झोपेचे वेळापत्रक व्यवस्थित नसल्यास, ते आतड्याचे मायक्रोबायोम बदलते.नेटफ्लिक्स पाहण्यासाठी उशिरा जागे राहणे किंवा तुमच्या सेल फोनला चिकटून राहणे याचा तितका गंभीर परिणाम होत नाही,परंतु तरीही ते तुमच्या आतड्यात नक्कीच गोंधळ घालू शकतात. 

समारोप

            आहार,प्रतिजैविके, कीटकनाशके, निसर्गापासून अंतर आणि तणाव या गोष्टींचा आतड्यांवर होणारा परिणाम याविषयी आपण माहिती घेतली.पण ध्यान आणि व्यायामामुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि झोपेचे चक्र व्यवस्थित होते,ज्यामुळे आतडेही रुळावर येण्यास मदत होते.आहारातील फायबर आणि वनस्पती-आधारित पदार्थांचे प्रमाण वाढवण्यामुळे,आपल्या आतड्यांमधील नैसर्गिक संतुलन सुधारण्यास मदत होईल, मायक्रोबायोमचे संतुलन सुधारण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थ आणि पूरक आहार हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. 'चांगल्या बॅक्टेरिया'चे हे थेट परिणाम आतड्याचे आरोग्य सुधारतात आणि पाचनाची समस्या कमी करण्यास मदत करतात.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. Although usage and popularity of probiotic is increasing, it's disadvantages and bad effects on human is neither documented in an orderly and scientific manner. In the circumstances one must focus on natural methods or provided by nature

    ReplyDelete
  2. 🙏छान उपयोगी माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...