Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

भ्रष्टाचाऱ्यांचा संपत्तीचा हव्यास

 Blog No.2024/036

Date: -22nd, February,2024.  

मित्रांनो,

            तुम्हाला जर वाटतं असेल की,अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी हे फक्त राजकारणी आणि तेही फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरुद्ध कारवाई करत आहे,तर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीची जी  वेबसाइट आहे ती पुढीलप्रमाणे आहे, https://enforcementdirectorate.gov.in/ त्यावर जाऊन खात्री करून घ्यावी. सत्य काय ते माहित न करून घेता जे ऐकतो किंवा वाचतो त्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही.हे सर्व लिहायचे कारण असे की  केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने माजी उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे (DPIIT) सचिव रमेश अभिषेक यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे.एखाद्या माणसाने किती संपत्तीचा हव्यास करावा,याला काही मर्यादा भ्रष्टाचारी लोकांनी ठेवली आहे,असे मला ही बातमी वाचल्यावर तरी वाटत नाही. 

सविस्तर    

1982 च्या बॅचच्या रमेश अभिषेक या आयएएस अधिकाऱ्यावर त्याच्या शेवटच्या पगारापेक्षा 119 पट जास्त संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. ते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या जवळचे मानले जाणारे अधिकारी, 2019 मध्ये DPIIT (पूर्वीचे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग) मधून निवृत्त झाले.भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 12,13 (2), 13(1) D आणि 13 (1) E अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवल्यानंतर,सीबीआयने मंगळवारी अभिषेकच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला.आणि कलम 120 B आणि 109 अंतर्गत बेकायदेशीर समृद्धी, लोकसेवकाकडून गुन्हेगारी गैरवर्तन, गुन्हेगारी कट आणि प्रोत्साहन यासाठी कारवाई करण्यात आली.

एफआयआरमध्ये त्यांच्या मुलीचे वनीसाचे आणि इतर अज्ञातांचीही नावे आहेत. लोकपालकडे केलेल्या तक्रारीनुसार, अभिषेकची डीपीआयआयटीच्या सचिवपदाच्या कार्यकाळात किमान 16 खासगी कंपन्यांवर मेहेरनजर होती.असे नोंदविण्यात आले आहे.अभिषेक यांस निवृत्तीनंतर, या कंपन्यांनी कथितरित्या कोट्यवधी रुपये रोख रक्कम म्हणून दिल्याचे कळते.हे पैसे निवृत्त नोकरशहाला सल्लागार फी म्हणून देण्यात आल्याचा आरोप आहे. ग्रेटर कैलासमधील अभिषेकचे दक्षिण दिल्लीतील घरही चौकशीच्या घेऱ्यात आहे.या घरासाठी जवळपास 8 कोटी रुपये रोख देण्यात आल्याचा आरोप लोकपालकडे करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

लोकपालने सीबीआयला कळविले आहे की,रमेश अभिषेक आणि त्यांची मुलगी वनीसा अग्रवाल यांनी  व्यावसायिक फी म्हणून किंवा सल्लागार फी म्हणून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली.श्री अभिषेक यांनी डीपीआयआयटी सचिव किंवा फॉरवर्ड मार्केट कमिशनचे अध्यक्ष म्हणून त्याचा ज्या विविध संस्था/संस्थांसोबत अधिकृत संबंध होता,त्यांच्याशी केलेल्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्यास सांगितले आहे.

या सोबतच स्थावर मालमत्तेमध्ये कुटुंबाच्या पूर्वीच्या गुंतवणुकीत अचानक झालेली संशयास्पद वाढ हा  अल्प कालावधीत व्यवसायाच्या उत्पन्नात अचानक वाढ झाल्याचा परिणाम होता,त्याची तपासणी सुरू आहे. असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, रमेश यांनी लोकपालसमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी निवृत्तीनंतर अवघ्या 15 महिन्यांत व्यावसायिक सल्लागार फी म्हणून 2.7 कोटी रुपये कमावले. रमेशला निवृत्तीच्या वेळी मिळालेल्या मासिक पगारापेक्षा (अंदाजे २.२५ लाख) हे 119 पट जास्त होते, असे ढोबळ आकडेमोडीवरून दिसून येते.अभिषेकवर असा ही आरोप आहे की त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून,आपल्या मुलीला विविध कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून नियुक्त केले,ज्या भारत सरकारच्या व्यवसाय सुलभता किंवा मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांना मदत करत होत्या.या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे.तक्रारीत आरोप आहे की अभिषेक हा चिदंबरम यांच्या जवळचा होता आणि चिदंबरम यांनी फॉरवर्ड मार्केट कमिशन (FMC) चे अध्यक्षपदी त्याला बढती दिली होती.तत्कालीन अर्थमंत्र्यांशी असलेल्या कथित जवळीकीमुळे त्यांना पाच वेळा मुदतवाढ मिळाली होती.अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अभिषेकवर मनी लाँड्रिंगच्या आरोपांचीही तपासणी करत आहे. 

समारोप

तुमच्या लक्षात आलं असेल की आयएएस दर्जाचा एक अधिकारी जर एवढा भ्रष्टाचार करत होता. तर तो कुणाच्या आशीर्वादाशिवाय करत असेल यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एकटा अधिकारी एवढा भ्रष्टाचार करु शकत असेल तर,भारतात आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची संख्या 4926 आहे.हा आकडा देखिल लक्षात घेण्यासारखा आहे.         

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...