Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

भ्रष्टाचाऱ्यांचा संपत्तीचा हव्यास

 Blog No.2024/036

Date: -22nd, February,2024.  

मित्रांनो,

            तुम्हाला जर वाटतं असेल की,अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी हे फक्त राजकारणी आणि तेही फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरुद्ध कारवाई करत आहे,तर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीची जी  वेबसाइट आहे ती पुढीलप्रमाणे आहे, https://enforcementdirectorate.gov.in/ त्यावर जाऊन खात्री करून घ्यावी. सत्य काय ते माहित न करून घेता जे ऐकतो किंवा वाचतो त्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही.हे सर्व लिहायचे कारण असे की  केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने माजी उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे (DPIIT) सचिव रमेश अभिषेक यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे.एखाद्या माणसाने किती संपत्तीचा हव्यास करावा,याला काही मर्यादा भ्रष्टाचारी लोकांनी ठेवली आहे,असे मला ही बातमी वाचल्यावर तरी वाटत नाही. 

सविस्तर    

1982 च्या बॅचच्या रमेश अभिषेक या आयएएस अधिकाऱ्यावर त्याच्या शेवटच्या पगारापेक्षा 119 पट जास्त संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. ते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या जवळचे मानले जाणारे अधिकारी, 2019 मध्ये DPIIT (पूर्वीचे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग) मधून निवृत्त झाले.भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 12,13 (2), 13(1) D आणि 13 (1) E अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवल्यानंतर,सीबीआयने मंगळवारी अभिषेकच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला.आणि कलम 120 B आणि 109 अंतर्गत बेकायदेशीर समृद्धी, लोकसेवकाकडून गुन्हेगारी गैरवर्तन, गुन्हेगारी कट आणि प्रोत्साहन यासाठी कारवाई करण्यात आली.

एफआयआरमध्ये त्यांच्या मुलीचे वनीसाचे आणि इतर अज्ञातांचीही नावे आहेत. लोकपालकडे केलेल्या तक्रारीनुसार, अभिषेकची डीपीआयआयटीच्या सचिवपदाच्या कार्यकाळात किमान 16 खासगी कंपन्यांवर मेहेरनजर होती.असे नोंदविण्यात आले आहे.अभिषेक यांस निवृत्तीनंतर, या कंपन्यांनी कथितरित्या कोट्यवधी रुपये रोख रक्कम म्हणून दिल्याचे कळते.हे पैसे निवृत्त नोकरशहाला सल्लागार फी म्हणून देण्यात आल्याचा आरोप आहे. ग्रेटर कैलासमधील अभिषेकचे दक्षिण दिल्लीतील घरही चौकशीच्या घेऱ्यात आहे.या घरासाठी जवळपास 8 कोटी रुपये रोख देण्यात आल्याचा आरोप लोकपालकडे करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

लोकपालने सीबीआयला कळविले आहे की,रमेश अभिषेक आणि त्यांची मुलगी वनीसा अग्रवाल यांनी  व्यावसायिक फी म्हणून किंवा सल्लागार फी म्हणून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली.श्री अभिषेक यांनी डीपीआयआयटी सचिव किंवा फॉरवर्ड मार्केट कमिशनचे अध्यक्ष म्हणून त्याचा ज्या विविध संस्था/संस्थांसोबत अधिकृत संबंध होता,त्यांच्याशी केलेल्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्यास सांगितले आहे.

या सोबतच स्थावर मालमत्तेमध्ये कुटुंबाच्या पूर्वीच्या गुंतवणुकीत अचानक झालेली संशयास्पद वाढ हा  अल्प कालावधीत व्यवसायाच्या उत्पन्नात अचानक वाढ झाल्याचा परिणाम होता,त्याची तपासणी सुरू आहे. असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, रमेश यांनी लोकपालसमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी निवृत्तीनंतर अवघ्या 15 महिन्यांत व्यावसायिक सल्लागार फी म्हणून 2.7 कोटी रुपये कमावले. रमेशला निवृत्तीच्या वेळी मिळालेल्या मासिक पगारापेक्षा (अंदाजे २.२५ लाख) हे 119 पट जास्त होते, असे ढोबळ आकडेमोडीवरून दिसून येते.अभिषेकवर असा ही आरोप आहे की त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून,आपल्या मुलीला विविध कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून नियुक्त केले,ज्या भारत सरकारच्या व्यवसाय सुलभता किंवा मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांना मदत करत होत्या.या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे.तक्रारीत आरोप आहे की अभिषेक हा चिदंबरम यांच्या जवळचा होता आणि चिदंबरम यांनी फॉरवर्ड मार्केट कमिशन (FMC) चे अध्यक्षपदी त्याला बढती दिली होती.तत्कालीन अर्थमंत्र्यांशी असलेल्या कथित जवळीकीमुळे त्यांना पाच वेळा मुदतवाढ मिळाली होती.अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अभिषेकवर मनी लाँड्रिंगच्या आरोपांचीही तपासणी करत आहे. 

समारोप

तुमच्या लक्षात आलं असेल की आयएएस दर्जाचा एक अधिकारी जर एवढा भ्रष्टाचार करत होता. तर तो कुणाच्या आशीर्वादाशिवाय करत असेल यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एकटा अधिकारी एवढा भ्रष्टाचार करु शकत असेल तर,भारतात आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची संख्या 4926 आहे.हा आकडा देखिल लक्षात घेण्यासारखा आहे.         

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...