Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय, माऊंट अबू

 Blog No.2023/314.  

Date: -23rd, December 2023. 

मित्रांनो,

            कालच्या ब्लॉगमध्ये दिलवाडा मंदिर, नक्की लेक आणि टोड रॉक विषयी आपण बघितलं.आज बाकी स्पॉट म्हणा स्थळ म्हणा,माहिती करून घेऊ.माऊंट अबूला आम्ही गेलो तेव्हा थंडी प्रचंड होती.म्हणजे 8 डिग्री एवढे तापमान होते.थंडीसाठी महाराष्ट्रात जी आयुधे आपण वापरत असतो,ती सारीच आयुधे तिथे कुचकामी ठरतात.म्हणून आम्ही पुण्याला रमेश डाईंगमध्ये जाऊन खरेदी केली.तिथे त्यांनी कुठे फिरायला जाताय,ते विचारले.ते सांगिल्यावर योग्य ते कपडे दाखविले.

प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय   

            प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय आंतरराष्ट्रीय,गैर-सरकारी आध्यात्मिक संस्थेचे मुख्यालय माउंट अबू येथे आहे.सगळ्यात आधी आम्ही तेथील यूनिवर्सल पीस हॉल” ला गेलो.तिथे पोहोचताच एक भगिनी आम्हाला दोघांना आंत घेऊन गेली आणि तिने हॉलमध्ये जातांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.त्या भगिनीने सगळ्यात आधी आम्हाला प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय हे नांव कसं ठेवलं गेलं आणि ते कसं समजलं जातं ते समजाविले.प्रजापिता ब्रम्हा म्हणजे या विश्वाचा निर्माता ब्रम्हदेव,कुमारी हे अखिल महिला जातीला उद्देशून आहे आणि विश्व विद्यालयचा अर्थ यूनिवर्सिटी किंवा विद्यापीठ हा अभिप्रेत नसून विश्व म्हणजे विश्वभरात पसरलेले विद्यालय होय.1930 च्या दशकात दादा लेखराज कृपलानी यांनी ही संस्था स्थापन केली.त्याआधी त्यांना  पाकिस्तानातील कराची येथे दिव्य साक्षात्कार झाला होता.तिथे त्यांचे बरेच अनुयायी होते.पण 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर त्यांनी आपले कार्य माऊंट अबू येथे हलविण्याचे ठरविले.येथे राजयोग हा ध्यानाचा एक प्रकार शिकवला जातो.या संस्थेची 100 देशांमध्ये 8,500 हून अधिक केंद्र आहेत आणि 825,000 नियमित विद्यार्थी असल्याचा दावा केला जातो.आम्ही भेट दिलेल्या पीस हॉलमध्ये एका वेळी 1000 लोक बसू शकतात.   

अचलगड गाव

हे गांव माउंट अबूमधील एक छोटे गाव आहे.जे अचलगड किल्ला आणि अचलेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.अचलगड हा किल्ला डोंगराच्या शिखरावर आहे.अचलगढपासून 5-7 मिनिटांची चढाई,तुम्हाला सुंदर आणि ऐतिहासिक जैन मंदिरांपर्यंत पोहोचवते.हे जैन मंदिर एक निसर्गरम्य स्थान आहे आणि सुंदर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे.अचलेश्वर मंदिर,5 धातू, पट, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांनी बनविलेल्या  नंदीसाठी प्रसिद्ध आहे.अचलगड किल्ला हा माउंट अबूमधील 15 व्या शतकातील किल्ला आहे,जो आता भग्नावस्थेत आहे. उध्वस्त झालेल्या किल्ल्याच्या संकुलात हनुमानपोल नावाचा एक दरवाजा आहे,जे की मुख्य प्रवेशद्वार आहे. किल्ला संकुलाच्या आत एक प्रसिद्ध शिव मंदिर (अचलेश्वर महादेव मंदिर) आणि मंदाकिनी तलाव आहे.असे सांगितले जाते.जैन मंदिरात जातांना उजव्या हाताला एक पुरातन शिव मंदिर आहे.अचलगड येथे माऊंट अबूच्या  प्रसिद्ध रबडीचा स्वाद घ्यायला विसरू नका.

गायमुख मंदिर

माउंट अबूमधील एक आकर्षण म्हणजे गायमुख मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे.या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे 700 पायऱ्यांची चढण हे आहे,या पायऱ्या उतरतांना आणि चढतांना,आजूबाजूच्या खोऱ्याचे विहंगम दर्शन घडते.घनदाट जंगलात, गायमुख,भगवान कृष्ण, भगवान राम आणि ऋषी वशिष्ठ यांच्या मूर्तींसोबत नंदीच्या मूर्ती आहेत.संगमरवरी नंदीच्या मुखातून पडणारा गूढ पाण्याचा प्रवाह लक्ष वेधून घेत असतो.म्हणूनच, गायमुख मंदिर हे भगवान शिवाचे भक्त आणि पर्यटक या दोघांमध्ये लोकप्रिय आहे.

अर्बुदा देवी मंदिर

अर्बुदा देवी मंदिर हे माउंट अबूमधील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते आणि ते राजस्थानच्या समृद्ध स्थापत्य वारशाची साक्ष म्हणून उभे आहे.अर्बुदा देवीला कात्यायनी देवीचा अवतार मानले जाते. हे मंदिर एक पवित्र हिंदू तीर्थक्षेत्र आहे आणि नवरात्रीच्या 9 पवित्र दिवसांमध्ये ते भाविकांनी गजबजलेले असते. 365 पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही अर्बुदा देवी मंदिरात पोहोचू शकता, प्रत्येक पायरी वर्षातील प्रत्येक दिवसाचे प्रतीक आहे जी एखाद्याला कठीण चढाईची वाटेल.परंतु वरून शहराचे संपूर्ण दृश्य पाहायला मिळत असल्याने ते प्रेक्षणीय आहे.

गुरु शिखर, माउंट अबू

गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगातील सर्वोच्च शिखर आहे आणि ते माउंट अबूपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1722 मीटर आहे.तिथून अरवली पर्वतरांगा आणि माउंट अबूच्या हिल स्टेशनचे चित्तथरारक दृश्य दिसते.'गुरूचे शिखर' हे नाव गुरू दत्तात्रयांच्या नावावरून ठेवण्यात आले होते,जे त्यांच्या काळात एक भिक्षु म्हणून शिखरावर राहत होते असे मानले जाते. त्याच्या स्मरणार्थ शिखरावरील गुहेचे रूपांतर मंदिरात करण्यात आले आहे.गुरु शिखर हे माउंट अबू वेधशाळेचेही केंद्र  आहे.गुरुशिखराच्या शीर्षस्थानी एक जुनी घंटा आहे,ज्यावर '1411 AD' असे शब्द कोरलेले आहेत. शिखरावर चढून गेल्यावर ती घंटा वाजवणे हे एक आकर्षण असते.कारण या घंटेचा नाद दूर दूर ऐकायला येतो.

समारोप

            साधारणतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान जरी थंडी जास्त असली तरी,जी पायऱ्या चढून किंवा उतरुन जायची ठिकाणे आहेत,ते सोपे व्हावे आणि माऊंट अबूमधील थंडीचा अनुभव घेता यावा म्हणून लोक या सीजनमध्ये येथे येत असतात.अचलगड गावात पोहोचल्यावर,जैन मंदिर किंवा किल्ल्यापाशी घेऊन जाणाऱ्या पायऱ्यापर्यंत सोडायचे रु.300/- घेतात.अरुंद रस्ता असल्याने आपण कार घेऊन गेलो तरी आपली कार आपल्या गावात सोडावी लागते.तिथपासून पायी पायी जाता येते एवढेच अंतर होते.आम्ही फसलो कारण आम्हाला कुणी सांगणारं नव्हतं.तुम्हाला मी सांगतो आहे,कुणाच्या सांगण्यावर जाऊ नका.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु, पुणे.

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...