Blog No.2023/291
Date: -20th, November 2023.
आयसीसी
क्रिकेट वर्ल्ड कप 2023 हा 5 ऑक्टोबर, 2023 पासून सुरू झालेला हा भव्य दिव्य
सोहळा/ही स्पर्धा आता संपली. ऑस्ट्रेलियाने कालची मॅच आणि त्यासोबत विश्वचषकही जिंकला.भारताला
हरवून जिंकला वगैरे मी यासाठी लिहिले नाही.कारण अशा सर्वोच्य क्षणाला जो संघ आपला दर्जा
किंवा स्तर उंचावतो,त्याचा विजय होत असतो.आता पराभवाची समीक्षा सगळेच करतील.पण खेळ
म्हटला एक टीम जिंकणार आणि एक हरणार.कालचा दिवस आपला नव्हता.
प्रास्ताविक
रोहित शर्माने
आपल्या नेहमीच्या स्टाइलने सुरुवात करून दिली होती. 1-10 ओवर्स मध्ये आपला रनरेट 8.00
होता. पण त्यानंतर ते जमले नाही,याला कारण ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंनी विशेषतः
बोलर्सने कॅप्टनच्या रणनितीनुसार सारं काही केले.त्यांनी अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग करून
त्यांच्या बोलर्सचे मनोबल उंचावले.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात 3 विकेट
2 रनवर गमावल्यानंतर आपण ती मॅच 6 विकेटने जिंकली होती. तेव्हा पहिली बॅटिंग ऑस्ट्रेलियाची
होती,त्यांनी 199 धावा केल्या होत्या. तेव्हा के. एल.राहुल आणि विराट कोहली या जोडीने
आपल्याला जिंकवले होते.पण काल दिवस आपला नव्हता.
या वर्ल्ड
कप मध्ये विराट कोहलीने सर्वात जास्त धावा केल्या.मोहम्मद शमी हा सगळ्यात जास्त विकेट
घेणारा गोलंदाज ठरला.या भारतीय संघाने देशातील क्रिकेट रसिकांना 10 सामना विजयाचा आनंद
मिळवून दिला.ज्या ऑस्ट्रेलिया टीमने वर्ल्ड कप जिंकला,त्या संघाला देखिल आपण साखळी
सामन्यात हरविले होते.त्यामुळे हा जरी विश्वचषकाचा सामना आपण गमावला असला तरी आपली
टीम ही आजवरची सगळ्यात चांगली टीम होती.असेच म्हणता येईल.
सारांश
विश्वचषकाचा थरार संपला.टीम कुठलीही एकच
जिंकते, ती भारतीय टीम असायला हवी होती,असं मला निश्चितपणे वाटतं होतं.त्यामुळे मलाही दु:ख झाले,
वाईट वाटलं.त्यातही रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसाठी अधिक वाईट वाटलं. कारण
कदाचित पुढच्या वर्ल्ड कपला हे दोघे नसतील.भारतीय संघाने केलेल्या एकूण रन्सपैकी जवळपास
1500 रन्स या दोघांनी काढले होते.त्या दोघांसाठी निश्चितपणे भारत जिंकायला हवा होता.कॉलेजच्या
दिवसांत परीक्षा संपल्यावर जसं सुनसुन वाटतं तसं आता वाटतंय.आता वेगवेगळ्या देशांशी
सिरीज होतील.पण ही मजा आता चार वर्षावर गेली.असो.कालच्या
माझ्या ब्लॉग मध्ये मी ऑस्ट्रेलियाच्या बलस्थानांमद्धे “ऑस्ट्रेलियन्सची झुंजार आणि लढाऊ
वृत्ती हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान आहे.”असे लिहिले होते आणि काल यामुळेच त्यांचा
विजय झाला,हे निश्चित. आजच्या ब्लॉगबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेन्ट
बॉक्समध्ये जरूर लिहा.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
Australians played better and that was the only difference between the two teams. Hope our public and sponsors shows similar response towards other sports. Only then we will become sports superpower. And becoming sports superpower is one way to showcase our presence in global arena. Well done Team India
ReplyDelete