Blog No.2023/252
Date:- 30th, September 2023.
मित्रांनो,
28 सप्टेंबर,1973
या दिवशी रिलीज झालेल्या एका चित्रपटाने किशोरवयीन
मुलांमधील प्रेमाची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडून एक धमाका केला होता.त्या चित्रपटाला
नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली.माझ्या वयाच्या मित्रांना लगेच लक्षात येईल की तो चित्रपट
दूसरा तिसरा कुठला नसून राज कपूर निर्मित दिग्दर्शित “बॉबी” हाच असणार. हो मी “बॉबी” चित्रपटाबद्दल बोलतोय आणि आजचा ब्लॉग “बॉबी” ला समर्पित.
प्रास्ताविक
राज कपूरने
या चित्रपटातून आपला मुलगा ऋषी कपूरला हीरो म्हणून प्रदर्शित केले आणि डिंपल कपाडिया
या नव्या हिरोईनला सुद्धा चित्रपटसृष्टीत आणले. या सोबतच शैलेन्द्रसिंग या नव्या गायकाचे
पदार्पण देखिल या चित्रपटाद्वारे झाले. पहिल्या चित्रपटात हे तीनही तारे प्रकाशात आले.ऋषी
कपूरने बरीच वर्षे चित्रपटसृष्टीवर राज्य केले आणि शैलेन्द्रसिंगला बरेच यश मिळाले.पण
डिंपल कपाडियाने मात्र त्याच वर्षी तेव्हाचा सुपरस्टार राजेश खन्नाशी लग्न करून चित्रपटसृष्टीला
रामराम ठोकला. पुनरागमनानंतर तिने अभिनेत्री म्हणून नांव कमावले पण “सागर” चित्रपट
सोडला तर तिला बॉक्स ऑफिसवर यश सामान्य मिळाले
नव्या पिढीतील वाचकांसाठी “बॉबी” ची कथा थोडक्यात देतो.
ही कथा वेगवेगळ्या वर्गातील दोन किशोरवयीन
मुलांमधील प्रेमकथा आहे - राजा 'राज' नाथ
(ऋषी कपूर) हा श्रीमंत
हिंदू उद्योगपती राम नाथ (प्राण) यांचा मुलगा आणि बॉबी ब्रिगांझा (डिंपल कपाडिया), या गोव्यातील ख्रिश्चन मच्छीमार जॅक ब्रिगांझा (प्रेम नाथ) यांच्या मुलीच्या प्रेमाची. राज
त्याच्या बोर्डिंग स्कूलमधून परतलेला असतो.परतल्यावर त्याचे आईवडील त्याचा वाढदिवस
साजरा करण्यासाठी पार्टी देतात. राजची माजी गव्हर्नस मिसेस ब्रिगांझा (दुर्गा
खोटे) तिची नात बॉबीसोबत त्याला भेटवस्तू देण्यासाठी येते, परंतु राजची आई सुषमा नाथ (सोनिया साहनी) मिसेस ब्रिगांझाकडे दुर्लक्ष करते,ज्यामुळे
मिसेस ब्रिगांझा बॉबीसोबत घाईघाईत पार्टी सोडून निघून जाते.
राज दुसऱ्या दिवशी त्या भेटवस्तू उघडतो
आणि त्याला मिसेस ब्रिगांझाची भेटवस्तु सापडते म्हणून तो तिला प्रत्यक्ष भेटण्याचा
निर्णय घेतो. तिथे पोहोचल्यावर बॉबी दार उघडते आणि हे त्याच्यासाठी love
at first sight असते.तो पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी तिला
लायब्ररीमध्ये भेटायला जातो आणि त्यातून दोघांची मैत्री सुरू होते.राजच्या मनमिळाऊ
स्वभावामुळे जॅक आणि मिसेस ब्रिगांझा,राज
आणि बॉबीच्या नात्याला मान्यता देतात. पण राजला कळते की हे नाते रामला (त्याच्या वडिलांना) मान्य नाही.ज्यांना त्याचा
मुलगा एका गरीब मच्छीमाराच्या मुलीच्या प्रेमात पडला आहे ही कल्पना पसंत पडत नाही.राजच्या
सांगण्यावरून,राम जॅकला राज आणि बॉबीच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित करतो. पण राज
आणि बॉबीच्या नात्याबद्दल बोलण्याऐवजी,राम जॅकचा अपमान करतो आणि
त्याच्या पैशासाठी राजला अडकवण्यासाठी बॉबीचे सौंदर्य आणि मोहिनी वापरल्याचा आरोप
करतो. मग त्यांचे भांडण होते.राम राजला बॉबीला भेटण्यास मनाई करतो.बॉबीच्या सुरक्षिततेसाठी, जॅक तिला आणि श्रीमती ब्रिगांझा यांना गोव्यात राहायला पाठवतो.
बॉबीला हाकलून दिल्याने राज आपल्या वडिलांवर रागावून,त्याच्या
वडिलांशी असलेले सर्व संबंध तोडतो आणि बॉबीला भेटण्यासाठी गोव्याला निघून जातो.नंतर
राम राजला शोधण्यात मदत करणार्याला $25,000 चे बक्षीस जाहीर करतो.एका स्थानिक वृत्तपत्रावर बक्षीस पाहिल्यावर, प्रेम चोप्रा (प्रेम चोप्रा) नावाचा स्थानिक लोभी गुंड,त्याच्या साथीदारांच्या मदतीने पैश्यासाठी राज आणि बॉबीचे अपहरण करतो.ते दोघे जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा
बॉबीला रोखण्यासाठी प्रेम राजला मारहाण करण्यास सुरुवात करतो. अखेरीस,जॅक
प्रेमवर हल्ला करून बचावासाठी येतो,जो त्याच्या गुंडांना जॅकला
मारहाण करण्याचा आदेश देतो.पण तिथे पोहोचलेला राम आणि पोलिस प्रेम आणि त्याच्या
गुंडांना अटक करतात.पण राज आणि बॉबी पळून जातात.राज आणि बॉबी धबधब्यावर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.पण राम आणि जॅक दोन्ही मुलांना
बुडण्यापासून वाचवतात.पश्चात्ताप झालेला राम आणि जॅक,राज आणि बॉबीच्या नात्याला आशीर्वाद देतात,नंतर
राज,बॉबी आणि त्यांचे वडील आनंदाने त्यांच्या कुटुंबाकडे परत
जातात.
चित्रपटाचे संगीत
या चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे असले तरी त्याला एक राज कपूर टच असल्याचे जाणवते. शैलेन्द्रसिंगने “मै शायर तो नही” हे सोलो गाणं खूप सुरेख म्हटलं आहे. “हम तुम एक कमरेमे बंद हो” हे शैलेन्द्रसिंगचे लता मंगेशकर यांच्या सोबतचं गाणं कमालीचं हिट झालं. याचं दोघांचं “झुट बोले कव्वा काटे” आणि “मुझे कुछ कहना है,पहले तुम पहले तुम” ही गीतं सुद्धा तूफान लोकप्रिय झाली.नरेंद्र चंचलने “बेशक मंदिर मस्जिद तोडो” हे गीत गाजलं. “ना मांगू सोना चांदी” हे मन्नादा, शैलेन्द्रसिंग आणि लता मंगेशकर यांचं गाणं ही हिट झालं. एकूण सगळीच गाणी हिट झाली.
सारांश
ऋषी कपूर
आणि डिंपल कपाडिया यांनी पदार्पणात सुरेख काम केले आहे. प्राण, प्रेमनाथ, अरुणा इराणी,
फरिदा जलाल, दुर्गा खोटे यांनी त्यांना सुरेख साथ दिली आहे.राधू कर्माकर यांची सुरेख
फोटोग्राफी, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे कर्णमधुर संगीत, आनंद बक्षी, विठ्ठलभाई पटेल
आणि इंदरजीत तुलसी यांची प्रसंगानुरूप गाणी आणि राजकपूरचे सुरेख दिग्दर्शन या चित्रपटाच्या
सगळ्याच बाजू छान जमून आल्याने चित्रपट हिट झाला.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
There is a similarity between the first meeting of Raj Kapoor-Nargis and Rishi Kapoor-Dimple Kapadia in the actual cinema.
ReplyDeleteThis film was shown at Metro Theatre in Mumbai.
Nice blog