ब्लॉग नं. 2026/110, दिनांक: 20 एप्रिल, 2026. मित्रांनो, प्रत्येक जेवणानंतर 10 मिनिटे चालल्यास काय होते ? आपल्यापैकी बरेच जण,आरोग्याच्या बाबतीत गोष्टी उगाचच गुंतागुंतीच्या करतात.आपल्या हे लक्षात येत नाही की , साध्या आणि छोट्या गोष्टी,आपले आरोग्य सुधारण्यास आणि ते नियंत्रणात ठेवण्यास,मदत करू शकतात.जेव्हा दररोज ठराविक पावले चालण्याचा किंवा चालण्याचा प्रश्न येतो , तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण मोठी उद्दिष्ट्ये ठेवतात. तथापि , संशोधनात असे दिसून आले आहे की , दिवसभरात 1 तास चालण्यापेक्षा दिवसभरात थोड्या-थोड्या वेळासाठी चालणे अधिक चांगले आहे.या विषयी अधिक जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: अनेक आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांनी,प्रत्येक जेवणानंतर 10 मिनिटे चालण्याच्या महत्त्वावर नेहमीच भर दिला आहे. या सोप्या उपायाचे अनेक फायदे आहेत आणि त्यातील एक मोठा फायदा म्हणजे , यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यामागील विज्ञान समजून घ्यायचे आहे का ? चला तर मग , ते तुम्हाला सविस्तरपणे सांगतो.प्रत्येक जेवणानंतर , शरीर अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास मदत करते ...
ब्लाॅग नं.2026/105 दिनांकः 15 एप्रिल, 2026. मित्रांनो , ज्येष्ठांमधील नैराश्य आणि त्यावरील उपाय वयोमानानुसार शरीरात बदल होणे स्वाभाविक आहे , पण जेव्हा मनाची उभारी संपते , तेव्हा जगणे ओझे वाटू लागते. अनेकदा आपण पाहतो की , घराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती अचानक चिडचिडी , रागीट किंवा कमालीची शांत होते. "आता माझी कोणाला गरज राहिलेली नाही ," ही भावना त्यांच्या मनात घर करू लागते. लोकमत पेपरमधील डॉ. दत्ता दातीर यांच्या लेखाच्या आधारे , आपण या समस्येचा आणि त्यावरील उपायांचा आढावा, आजच्या ब्लॉगमधे घेऊया. सविस्तरः नैराश्याची कारणे: मानसशास्त्रीय दृष्टिकोन प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांच्या सिद्धांतानुसार , उतारवयात माणूस दोन टोकांच्या भावनांमधून जात असतो: 'Generativity vs. Stagnation' ( उपयुक्तता विरुद्ध कुंठितता) आणि 'Ego Integrity vs. Despair' ( आत्मस्वीकार विरुद्ध निराशा). कुंठिततेची भावना: जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते की,आपण पुढच्या पिढीसाठी काहीही ठोस करू शकलो नाही , तेव्हा मनात रिक्तता निर्माण होते. अपेक्षाभंग : आयुष्यभर कुटुं...