Skip to main content

Posts

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

बहारोने मेरा चमन लूट कर

ब्लॉग नं. 2025/05 7 . दिनांक: 2 6 फेब्रूवारी , 2025. मित्रांनो , कधी कधी काही गाणी खूप दिवस लक्षात रहातात.एवढेच नव्हे ते तर ती आपल्या मनावर कोरली जातात.अशी खूप आशयपूर्ण गाणी जी मनात ठसून रहातात आणि काही वेळा त्या गाण्यांशी काही आठवणी जोडल्या जातात.तरुणपणी मनुष्याच्या वाटेला असे काही प्रसंग येतात की जे एखाद्या गाण्याशी जोडले जातात.अशीच एक गोष्ट मी आज सांगणार आहे , त्या गोष्टीशी म्हणा , आठवणीशी म्हणा हे गाणे जोडले गेले आहे.   सविस्तर:           मी रेल्वेने नासिक रोड स्टेशनवरुन अकोल्याला येत होतो. नासिक रोडला एक वरात एका डब्यात चढली.ते सर्व एका डब्यात चढले होते.पण आतापर्यन्त नवरी मुलगी आणि नवऱ्या मुलासोबत अगदी मोकळे पणाने बोलणारा एक तरुण मुलगा माझ्या सोबत दुसऱ्या डब्यात चढला. तो वरातीसोबत चढला नाही.अचानक एक माणूस जो ट्रांजिस्टर घेऊन बसला होता. त्याच्या रेडियोवर   स्व.मुकेश यांनी गायलेले, “देवर” सिनेमातील हे गाणं लागलं.गीत आनंद बक्षी यांच, संगीत रोशन (राजेश आणि राकेश रोशन यांचे वडील) यांच आणि याचं चित्रण हे धर्मेंद्रवर करण्यात आलं होतं.   ...

शरीरावर असणारे तीळ; धार्मिक, शास्त्रीय आणि ज्योतिष्यित मत

ब्लॉग नं. 2025/05 6 . दिनांक: 2 5 फेब्रूवारी , 2025.    मित्रांनो ,             पूर्वी शाळेत असतांना,मला आठवतंय की स्काऊट,गाइड किंवा एनसीसी मध्ये दाखल व्हायचे असेल तर काही जन्मखूण आहे कां? असे विचारत.तेव्हा शरीरावर असणाऱ्या तिळांबद्दल विचारलं जाई.मग हळूहळू काही तीळ हे सौदर्य वाढवितात,हे कानावर येऊ लागलं.त्यानंतर त्याबद्दल काही आख्यायिका देखिल ऐकायला मिळाल्या,जसं की त्वचेवर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या तिळांमुळे काय होते वगैरे. मी आजच्या ब्लॉगमध्ये याबद्दल सविस्तर सांगणार आहे.                                     सविस्तर: शरीरावर तीळ: कारणे आणि आख्यायिका: शरीरावर असलेल्या तीळांना आपण सहज दुर्लक्ष करतो , पण त्यांच्याबद्दल शास्त्रीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विचार केल्यास अनेक रोचक गोष्टी समोर येतात. तीळ कशामुळे होतात , त्यांचे प्रकार काय आहेत , आणि विशिष्ट ठिकाणी असलेल्या तीळांबद्दल आख्यायिका का सांगितल्या जातात , हे समजून घे...

नाभी किंवा बेंबीचे महत्व

ब्लॉग नं. 2025/055. दिनांक: 24 फेब्रूवारी , 2025   मित्रांनो , विज्ञानानुसार , गर्भधारणा झाल्यानंतर तयार झालेला पहिला भाग म्हणजे नाभी किंवा बेंबी.ती तयार झाल्यानंतर , ती  नाभीमार्गे आईच्या नाळेशी जोडली जाते.   जेव्हा एखाद्या स्त्रीच्या शरीरात मूल वाढत असतं,तेव्हा या नाभी वाटेच बाळाला पोषण पुरवले जाते आणि पूर्ण वाढ झालेले मूल, विकास व्हायला, 270 दिवस किंवा 9 महिने घेते.म्हणूनच नाभी किंवा बेंबीचे माणसाच्या शरीरात महत्वाचे स्थान आहे.नाभीशी आपल्या सर्व शिरा जोडलेल्या असतात.ज्यामुळे ती आपल्या शरीराचा केंद्रबिंदू बनते. " पेचोटी" नाभीच्या मागे स्थित आहे,ज्यावर 72,000 अधिक शिरा आहेत.आपल्या शरीरात एकूण रक्तवाहिन्यांचे प्रमाण पृथ्वीच्या परिघाच्या दुप्पट आहे.आज आपण शरीरात नाभीचे महत्व काय ते आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: नाभीचे महत्त्व आणि बेंबीवर तेल मालीश करण्याचे फायदे भारतीय आयुर्वेद आणि योगशास्त्रात नाभी अर्थात बेंबीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. बेंबी शरीरातील ऊर्जा केंद्र ( energy center) मानले जाते , ज्याला संस्कृतमध्ये "नाभीचक्र"...

जमिनीवर झोपणे फायदेकारक

ब्लॉग नं. 2025/054 दिनांक: 23 फेब्रूवारी , 2025.   मित्रांनो ,           आज काल लग्न समारंभात येणाऱ्या लोकांना सेपरेट रुम लागते.दोन दिवसासाठी घराबाहेर रहाणाऱ्यांना देखिल प्रायव्हसी लागते.मला आठवतंय माझ्या लहानपणी लग्न समारंभात एका हॉलमधे जमिनीवर गाद्या घातलेल्या असतं,जिथे लग्नाला आलेल्या पुरुषांची रात्री झोपण्याची व्यवस्था असे आणि दुसऱ्या हॉलमधे लग्नाला आलेल्या स्त्रियांची व्यवस्था.तेव्हा कुणी प्रायव्हसी नाही , वगैरेची तक्रार करित नसे.पण आता तसं राहिलं नाही. त्यामुळे आज काल जमिनीवर कुणी झोपत नाही. पण जमिनीवर झोपण्याचे काही फायदे आहेत. आजच्या ब्लॉगमधे आपण आज ते पहाणार आहोत. सविस्तर :           आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत गाद्यांवर किंवा आरामदायक बेडवर झोपणे ही सामान्य गोष्ट बनली आहे. मात्र , प्राचीन काळापासून आपल्या आयुर्वेद आणि योगशास्त्रात जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. शरीर व मनाचे आरोग्य राखण्यासाठी जमिनीवर झोपणे हा एक सोपा व नैसर्गिक उपाय आहे. याचे फायदे शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि अनुभवाच्या आधारावर समज...