Skip to main content

Posts

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

दुपारची झोप किती चांगली किती वाईट

ब्लॉग नं. 2025/084 . दिनांक:- 2 5 मार्च , 2025.   मित्रांनो ,  झोप ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. रात्रीची झोप असो किंवा दुपारची डुलकी , ती आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र , दुपारच्या झोपेमुळे रात्रीच्या झोपेवर दुष्परिणाम होतो का ? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. या ब्लॉगमध्ये आपण दुपारच्या झोपेचे फायदे-तोटे समजून घेऊ आणि दुपारची झोप किती घ्यावी हे देखिल जाणून घेऊ. सविस्तर: दुपारच्या झोपेचे फायदे दुपारची झोप , विशेषतः "पॉवर नॅप" दुपारची डुलकी (15-30 मिनिटे) घेतल्यास , शरीराला आणि मनाला अनेक फायदे होतात. 1. ऊर्जेचे पुनर्भरण: दुपारच्या झोपेमुळे शारीरिक थकवा कमी होतो आणि ऊर्जेचे पुनर्भरण होतो. 2. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते: दुपारची छोटी झोप स्मरणशक्ती सुधारते आणि कामातील लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवते. 3. ताणतणाव कमी होतो: तणावमुक्त होण्यासाठी दुपारची झोप एक प्रभावी उपाय ठरते. 4. हृदयाचे आरोग्य सुधारते: संशोधनात असे दिसून आले आहे की नियमित दुपारची झोप हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर अ...

सुदृढ जीवन, एक समग्र दृष्टीकोन

ब्लाॅग नं. 2025/083. दिनांक:- 24 मार्च, 2025. मित्रांनो ,            सुदृढ जीवन म्हणजे केवळ शरीराने तंदुरुस्त असणे नाही, तर शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक संतुलन साधणारा समग्र दृष्टिकोन होय. आपल्या शरीराची, मनाची, भावना आणि आत्म्याची काळजी घेणे यामध्ये येते. सुदृढ जीवन जगण्यासाठी आपल्याला या सर्व बाबींचा एकत्र विचार करावा लागतो. 1. शारीरिक आरोग्याचा पाया:                शारीरिक आरोग्य हे सुदृढ जीवनाचे प्राथमिक अंग आहे. नियमित व्यायाम, पोषणमूल्यांनी समृद्ध आहार आणि पुरेशी झोप ही शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाची तत्त्वे आहेत. आहार :                 शरीराला ऊर्जा देणारा, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आणि शरीराला सुदृढ ठेवणारा आहार महत्त्वाचा आहे. जास्त गोड, तुपकट किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळावे. व्यायाम :                      दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केल्यास शरीर सुद...

शेंगदाणे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

  ब्लॉग नं. 2025/08 2.  दिनांक:- 23 मार्च , 2025. मित्रांनो, शेंगदाणे , ज्यांना "गरिबांचे बदाम" म्हणूनही ओळखले जाते , आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. त्यामध्ये प्रथिने , फायबर , चांगले फॅट्स आणि विविध पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.वजन कमी करण्यासाठी शेंगदाण्यांचा योग्य पद्धतीने आहारात समावेश केल्यास,हे अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.वजन कमी करताना आहारामध्ये पोषणमूल्यांची गरज असते , आणि शेंगदाणे ही गरज पूर्ण करतात. परंतु , वजन कमी करताना त्यांचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.आजच्या ब्लॉगमध्ये या संबंधी जाणून घेऊ. सविस्तर:     शेंगदाण्यांमधील पोषकतत्त्वे: शेंगदाणे प्रथिने , फायबर , चांगले फॅट्स (मोनो-अनसॅच्युरेटेड आणि पॉली-अनसॅच्युरेटेड फॅट्स) , जीवनसत्त्वे (जसे की व्हिटॅमिन बी 3, बी 6 आणि ई) आणि खनिजे (जसे की मॅग्नेशियम , फॉस्फरस , पोटॅशियम) यांचा चांगला स्रोत आहेत. हे पोषकतत्त्व शरीराला उर्जा देतात , पचन सुधारतात , आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करतात. यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया सोपी आणि टिकाऊ बनते. वजन कमी करण्यासाठी शेंगदाण्या...

आत्मशांती म्हणजे काय? ती कशी मिळवावी?

ब्लॉग नं. 2025/081 दिनांक:- 22 मार्च , 2025. मित्रांनो,              माणसाला ऐहिक गोष्टीमुळे सुख तर प्राप्त होते,पण समाधान मिळत नाही.कारण समाधान हे मिळत नसतं  तर ते मानण्यावर अवलंबून असतं. समाधान मिळविण्यासाठी मग काही लोक आत्मशांतीचा मार्ग अवसरतात/ अवलंबितात.पण नेमकं आत्मशांती म्हणजे काय? तिचे आपल्या जिवनात काय महत्व आहे?आत्मशान्ती कशी मिळवावी? हे सारे आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.                  सविस्तर: आत्मशांती म्हणजे काय ? आत्मशांती म्हणजे मनाची स्थिरता आणि अंतर्गत समाधान. ती बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसते , तर ती आपल्यामध्येच अस्तित्वात असते. आत्मशांती प्राप्त झाली की , व्यक्ती बाहेरील परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती मानसिक शांतता टिकवू शकते.आत्मशांती म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे , जीवनातील अपयश आणि यश यांचा समतोल राखणे , आणि स्वतःच्या निर्णयांवर आत्मविश्वास ठेवणे. आत्मशांतीचे महत्त्व: 1 . मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर : आत्मश...

मेंदूचे आरोग्य कसे टिकवाल

ब्लॉग नं. 2025/080 दिनांक:- 21   मार्च , 2025. मित्रांनो, आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू .              मेंदू आपल्या सर्व क्रियांचे नियमन करतो आणि त्याचे आरोग्य उत्तम राखणे ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय , नवी मुंबई येथील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. यतीन सागवेकर यांनी मेंदूच्या आरोग्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. चला , त्यावर चर्चा करूया.             मेंदू हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हटलं तरी चालेल.शरीराला नियंत्रित करण्याचे महत्वाचे कार्य मेंदू करत असतो.शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचे आरोग्य जपण्यासाठी सल्ले नेहमीच दिले जातात किंवा वाचायला मिळते. पण मेंदूच्या आरोग्याबद्दल फारसे बोलले जात नाही,वाचायला मिळत नाही.माझ्या वाचनात एवढ्यात एक पोस्ट आली,ती मी आजच्या ब्लॉगमधून शेअर करत आहे. सविस्तर:             मेंदूच्या आरोग्यासाठी तीन महत्वाच...

निवृत्तीनंतर शिक्षणाचे महत्व

ब्लॉग नं. 2025/07 9 दिनांक:- 20 मार्च , 2025. मित्रांनो             निवृत्तीनंतर बऱ्याच लोकांना आता आपल्याला काही महत्व राहिलं नाही,आपल्याला कुणी मित्र राहिले नाही,जगण्यासाठी ध्येय किंवा उद्देश उरला नाही, आपल्याला कुणी विचारत नाही असे वाटतं असतं.तर काही घरच्या परिवारीक समस्यांमध्ये कारण नसतांना लक्ष देणे,आपले मत व्यक्त करणे,आजूबाजूच्या लोकांच्या संसारामध्ये विनाकारण लक्ष देणे अशा सवयी जडतात.तरी आजकाल लोक बऱ्यापैकी स्वतःला काही ना काही गोष्टीत गुंतवून घेत असतात.पण मग अचानक एखाद्या वेळी ही भावना जागृत होते. यासाठी माणसाने सदैव काही तरी शिकत राह्यला हवं. आजचा ब्लॉग या विषयावर आहे. सविस्तर: 1. मानसिक आरोग्यासाठी शिक्षणाचे महत्त्व: नवीन गोष्टी शिकल्यामुळे मेंदू सतत सक्रिय राहतो.निवृत्तीनंतर बरेच जण मानसिक आव्हाने किंवा एकाकीपणाच्या समस्यांना सामोरे जातात. मात्र , सतत शिकत राहिल्यास मेंदूला व्यायाम मिळतो आणि एकाग्रता , स्मरणशक्ती व विचार करण्याची क्षमता सुधारते. उदाहरणार्थ , निवृत्तीनंतर नवीन भाषा शिकणे , संगणक तंत्रज्ञान आत्...

रेखाचरित्रम् एक रहस्यमय चित्रपट

ब्लॉग नं. 2025/07 8 दिनांक:- 1 9 मार्च , 2025. मित्रांनो ,             मला आठवतंय 1985-90 चा काळ,नुकताच ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वर्ध्यात आला होता.मी माझ्या घरी “कोणार्क” म्हणजे ओरिसा इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशनचा टीव्ही विकत घेतला होता. हे सांगायचं कारण म्हणजे 1985-90 या काळात साधारणतः फक्त “दूरदर्शन” हे फक्त एकच चॅनल दिसायचं आणि तेही घरावर तो अॅन्टेना लावूनच नव्हे,तर वेळोवेळी अॅडजस्ट करून.त्या काळात दर रविवारी दुपारी 1.30 वाजता प्रादेशिक चित्रपट इंग्लिश सबटाइटल्स सकट दाखविले जायचे.मी आणि आई,दोघेही हे चित्रपट पहात असू.ते सगळेच चित्रपट, पारितोषिक विजेते चित्रपट असतं.या गोष्टीची आठवण व्हायचे कारण म्हणजे,नुकताच मी एक हिन्दीमध्ये डब केलेला   “ रेखाचित्रम्”   हा एक सुरेख चित्रपट पाहिला.मला रहस्यमय थ्रिलर चित्रपट फार आवडतात.या चित्रपटात शेवट पर्यंत रहस्य टिकवून ठेवण्यात दिग्दर्शक जोफिन टी चाको कमालीचे यशस्वी झाले आहेत. आजचा ब्लॉग याच विषयावर. सविस्तर: चित्रपटाचे कथानक: चित्रपटाची सुरुवात भूतकाळात होते , एका काळोख्या आणि...