Skip to main content

Posts

Showing posts from February, 2025

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

विचार करा, अतिविचार करू नका.

ब्लॉग नं: 2025/059 दिनांक: 28 फेब्रुवरी, 2025. मित्रांनो:             बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस एखाद्याला सांगितलं जातं की, तू विचार अजिबात करत नाहीस आणि हे सारे विचार न करण्याचे परिणाम आहेत.अन काही वेळेस असंही म्हटलं जात की, तू ना अतिविचार करतोस,त्याचे हे परिणाम आहेत.मग नेमकं करायचं काय हा प्रश्न मनांत उभा राहतो. उत्तर आहे,विचार करा पण अति-विचार करू नका. कारण विचार करण्याचे सकारात्मक परिणाम असू शकतात,पण अति-विचाराचे अधिकाधिक वेळा नकारात्मक परिणाम दिसून येतात.आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये अति-विचार म्हणजे काय? अति-विचाराचे काय परिणाम होतात आणि तो कसा थांबवावा? हे जाणून घेणार आहोत.                                           अति-विचार म्हणजे काय ? आणि तो कसा थांबवावा ? अति-विचार म्हणजे काय ? अति-विचार म्हणजे एखाद्या समस्येचा किंवा परिस्थितीचा पुनःपुन्हा विचार करणे , ज्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो. हा विचारांचा वेग एवढा जास्त ...

इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे काय?

ब्लॉग नं. 2025/05 8 . दिनांक: 2 7 फेब्रूवारी , 2025   मित्रांनो ,             मला असं वाटतं की,मधुमेहावर जेवढे वेगवेगळे ब्लॉग मी लिहिलेत,तेवढे कुठल्या आजारावर लिहिले नाहीत.याला कारण म्हणजे, या आजारात मोठे परिणाम जाणवत नाही. हृदयाच्या आजारासारखा यांत झटपट परिणाम होत नाही,किंवा एखादा व्यक्ति जसा हृदयविकाराने मृत पावला,तशी बातमी मधुमेहाने मृत पावला येत नाही. म्हणून मधुमेही या आजाराला हलक्यात घेतात.म्हणून मी मधुमेहीना सावध करण्यासाठी ब्लॉग लिहितो.मधुमेह होण्यासाठी एक महत्वाचे कारण म्हणजे इंसुलिन प्रति रोध. काय आहे इंसुलिन प्रति रोध? हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सविस्तर: इन्सुलिन प्रति रोध म्हणजे काय ? इन्सुलिन प्रति रोध ( Insulin Resistance) म्हणजे शरीराच्या पेशी इन्सुलिन या संप्रेरकाला योग्य प्रतिसाद देत नाहीत,कार्य करू देत नाहीत.यामुळे रक्तातील साखरेचे (ग्लुकोज) पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शरीराला अधिक इन्सुलिन तयार करावे लागते.दीर्घकाळ इन्सुलिन प्रति रोध टिकून राहिल्यास 2 प्रकारचा   मधुमेह ( Type ...