Skip to main content

Posts

Showing posts from February, 2025

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

विचार करा, अतिविचार करू नका.

ब्लॉग नं: 2025/059 दिनांक: 28 फेब्रुवरी, 2025. मित्रांनो:             बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस एखाद्याला सांगितलं जातं की, तू विचार अजिबात करत नाहीस आणि हे सारे विचार न करण्याचे परिणाम आहेत.अन काही वेळेस असंही म्हटलं जात की, तू ना अतिविचार करतोस,त्याचे हे परिणाम आहेत.मग नेमकं करायचं काय हा प्रश्न मनांत उभा राहतो. उत्तर आहे,विचार करा पण अति-विचार करू नका. कारण विचार करण्याचे सकारात्मक परिणाम असू शकतात,पण अति-विचाराचे अधिकाधिक वेळा नकारात्मक परिणाम दिसून येतात.आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये अति-विचार म्हणजे काय? अति-विचाराचे काय परिणाम होतात आणि तो कसा थांबवावा? हे जाणून घेणार आहोत.                                           अति-विचार म्हणजे काय ? आणि तो कसा थांबवावा ? अति-विचार म्हणजे काय ? अति-विचार म्हणजे एखाद्या समस्येचा किंवा परिस्थितीचा पुनःपुन्हा विचार करणे , ज्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो. हा विचारांचा वेग एवढा जास्त ...

इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे काय?

ब्लॉग नं. 2025/05 8 . दिनांक: 2 7 फेब्रूवारी , 2025   मित्रांनो ,             मला असं वाटतं की,मधुमेहावर जेवढे वेगवेगळे ब्लॉग मी लिहिलेत,तेवढे कुठल्या आजारावर लिहिले नाहीत.याला कारण म्हणजे, या आजारात मोठे परिणाम जाणवत नाही. हृदयाच्या आजारासारखा यांत झटपट परिणाम होत नाही,किंवा एखादा व्यक्ति जसा हृदयविकाराने मृत पावला,तशी बातमी मधुमेहाने मृत पावला येत नाही. म्हणून मधुमेही या आजाराला हलक्यात घेतात.म्हणून मी मधुमेहीना सावध करण्यासाठी ब्लॉग लिहितो.मधुमेह होण्यासाठी एक महत्वाचे कारण म्हणजे इंसुलिन प्रति रोध. काय आहे इंसुलिन प्रति रोध? हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सविस्तर: इन्सुलिन प्रति रोध म्हणजे काय ? इन्सुलिन प्रति रोध ( Insulin Resistance) म्हणजे शरीराच्या पेशी इन्सुलिन या संप्रेरकाला योग्य प्रतिसाद देत नाहीत,कार्य करू देत नाहीत.यामुळे रक्तातील साखरेचे (ग्लुकोज) पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शरीराला अधिक इन्सुलिन तयार करावे लागते.दीर्घकाळ इन्सुलिन प्रति रोध टिकून राहिल्यास 2 प्रकारचा   मधुमेह ( Type ...