Blog No.2024/027 .
Date:
-8th, February,2024.
मित्रांनो,
“तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,क्या गम है जिसको छुपा रहे हो.” या आणि अशा सुरेख आणि सुरेल गझलचे गायक, धीर गंभीर आवाजाचे धनी जगजीतसिंह यांची आज 83 वी जयंती.हिन्दी सोबतच त्यांनी पंजाबी,उर्दू, बंगाली,गुजराती,सिंधी आणि नेपाळी भाषेत गायन केले.केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण हा तृतीय सर्वोच्य नागरी सन्मान प्रदान करून गौरवान्वित केले होते.आजचा ब्लॉग हा जगजीतसिंह यांचेवर.
प्रास्ताविक
जगजीतसिंह यांचा जन्म राजस्थानातील श्रीगंगानगर येथे 8 फेब्रुवारी,
1941 ला शीख परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नांव सरदार अमरसिंह
धिमान होते.ते सरकारी खात्यात सर्वेअर म्हणून नोकरीला होते. जगजीतसिंह यांच्या
आईचे नाव बच्चन कौर असे होते. त्या गृहिणी होत्या. जगजीतसिंह यांनी कला शाखेतील पदवी जालंधरमधील डीएव्ही महाविद्यालयातून घेतली. ऑल इंडिया
रेडिओच्या जालंधर स्टेशनवर त्यांनी गायन केले. येथूनच त्यांच्या संगीत क्षेत्रातील
कारकिर्दीला सुरुवात झाली. 1966 यांनी जेव्हा एचएमव्ही कंपनीसोबत काम केले,तेव्हा ते शीख असल्याने पगडी आणि दाढी अशा पेहरावात होते. गायक म्हणून असे रूप शोभत नाही म्हणून त्यांनी
पगडी आणि दाढी दूर सारली.त्यांनी मुंबईत स्थायिक होण्याचे ठरविले. त्या नंतर त्यांचा
चित्रा यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर या दाम्पत्याला मुलगा झाला.त्याचे नाव विवेक. मात्र, ऐन तारुण्यात त्यांचा 18 वर्षांचा मुलगा
विवेकचा अपघातात मृत्यू झाला.हा आघात जगजीतसिंग आणि चित्रा यांच्या
सहनशक्तीपलीकडचा होता. चित्रासिंह यांनी तर गाणे सोडले.मुलाच्या मृत्यूनंतर ते बऱ्याच दिवस अज्ञातवासात
होते. “जगने छिना मुझसे,मुझे जो भी लगा प्यारा” या प्रेम गीत या चित्रपटातील “होटोसे
छू लो तुम” या गझलमधील ओळी गातांना कार्यक्रमात त्यांचे डोळे मुलाच्या आठवणीने भरून
येत.
जगजीतसिंग यांची सदाबहार गझल
1. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,क्या गम है जिसको छुपा रहे हो.
2. होंटोंसे छू लो तुम मेरा गीत अमर कर दो.
3. झुकी झुकी सी नज़र बे-क़रार है कि नहीं
4. वो कागज़ की कश्ती.
5. तुम को देखा तो यह खयाल आया.
6. होश वालों को खबर क्या
7. ये तेरा घर यह मेरा घर
8. प्यार का पहला खत
9. कल चौदहवी की रात थी.
10. तेरे आने की जब खबर महके
मृत्यु
वयाच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त संगीतप्रेमींसाठी वर्षभरात
70 कार्यक्रम सादर करायचे त्यांनी ठरविले होते.त्यांचं मन तरुण होतं पण प्रकृती साथ
देत नव्हती.अशातच 10 ऑक्टोबर, 2011 ला त्यांचे
मेंदूतील रक्तस्त्रावाने त्यांचे मुंबई येथे निधन झाले.
समारोप
अशा या धीर गंभीर आवाजाच्या गायकाला त्यांच्या 83 व्या जयंतीस
माझी ही शब्द सुमनांजली.त्यांच्या गझलच्या रूपाने ते अजूनही आपल्यात आहे.
तुम्हाला आजचा
ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
All hit songs (gazals) . And nice blog
ReplyDelete