Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

धीर गंभीर आवाजाचे धनी जगजीतसिंह

 Blog No.2024/027

Date: -8th, February,2024.     

 

मित्रांनो,  

            तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,क्या गम है जिसको छुपा रहे हो.” या आणि अशा सुरेख आणि सुरेल गझलचे गायक, धीर गंभीर आवाजाचे धनी जगजीतसिंह यांची आज 83 वी जयंती.हिन्दी सोबतच त्यांनी पंजाबी,उर्दू, बंगाली,गुजराती,सिंधी आणि नेपाळी भाषेत गायन केले.केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण हा तृतीय सर्वोच्य नागरी सन्मान प्रदान करून गौरवान्वित केले होते.आजचा ब्लॉग हा जगजीतसिंह यांचेवर. 

प्रास्ताविक

            जगजीतसिंह यांचा जन्म राजस्थानातील श्रीगंगानगर येथे 8 फेब्रुवारी, 1941 ला शीख परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नांव सरदार अमरसिंह धिमान होते.ते सरकारी खात्यात सर्वेअर म्हणून नोकरीला होते. जगजीतसिंह यांच्या आईचे नाव बच्चन कौर असे होते. त्या गृहिणी होत्या. जगजीतसिंह यांनी कला शाखेतील पदवी जालंधरमधील डीएव्ही महाविद्यालयातून घेतली. ऑल इंडिया रेडिओच्या जालंधर स्टेशनवर त्यांनी गायन केले. येथूनच त्यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. 1966 यांनी जेव्हा एचएमव्ही कंपनीसोबत काम केले,तेव्हा ते शीख असल्याने पगडी आणि दाढी अशा पेहरावात  होते. गायक म्हणून असे रूप शोभत नाही म्हणून त्यांनी पगडी आणि दाढी दूर सारली.त्यांनी मुंबईत स्थायिक होण्याचे ठरविले. त्या नंतर त्यांचा चित्रा यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर या दाम्पत्याला मुलगा झाला.त्याचे नाव विवेक. मात्र, ऐन तारुण्यात त्यांचा 18 वर्षांचा मुलगा विवेकचा अपघातात मृत्यू झाला.हा आघात जगजीतसिंग आणि चित्रा यांच्या सहनशक्तीपलीकडचा होता. चित्रासिंह यांनी तर गाणे सोडले.मुलाच्या मृत्यूनंतर ते बऱ्याच दिवस अज्ञातवासात होते. “जगने छिना मुझसे,मुझे जो भी लगा प्यारा” या प्रेम गीत या चित्रपटातील “होटोसे छू लो तुम” या गझलमधील ओळी गातांना कार्यक्रमात त्यांचे डोळे मुलाच्या आठवणीने भरून येत.                  

 जगजीतसिंग यांची सदाबहार गझल

1.       तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,क्या गम है जिसको छुपा रहे हो.

2.       होंटोंसे छू लो तुम मेरा गीत अमर कर दो.

3.       झुकी झुकी सी नज़र बे-क़रार है कि नहीं       

4.       वो कागज़ की कश्ती.

5.       तुम को देखा तो यह खयाल आया.

6.       होश वालों को खबर क्या

7.       ये तेरा घर यह मेरा घर

8.       प्यार का पहला खत

9.       कल चौदहवी की रात थी.

10.  तेरे आने की जब खबर महके             

मृत्यु

            वयाच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त संगीतप्रेमींसाठी वर्षभरात 70 कार्यक्रम सादर करायचे त्यांनी ठरविले होते.त्यांचं मन तरुण होतं पण प्रकृती साथ देत नव्हती.अशातच 10 ऑक्टोबर, 2011 ला त्यांचे मेंदूतील रक्तस्त्रावाने त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

 समारोप    

            अशा या धीर गंभीर आवाजाच्या गायकाला त्यांच्या 83 व्या जयंतीस माझी ही शब्द सुमनांजली.त्यांच्या गझलच्या रूपाने ते अजूनही आपल्यात आहे.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे.

 

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...