Skip to main content

डाळी प्रथिनांनी समृद्ध

ब्लॉग नं. 2025/15 7 दिनांक :- 7 जून ,  2025. मित्रांनो , जगभरातील बहुतेक आहारांमध्ये , विशेषतः शाकाहारी आणि व्हेगन आहारांमध्ये , डाळी हा एक सामान्य पदार्थ आहे , कारण त्यात प्रथिने जास्त प्रमाणात असतात.स्नायूंची दुरुस्ती , रोगप्रतिकारक शक्ती आणि सामान्य आरोग्यामध्ये प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात आणि म्हणूनच ज्यांना त्यांच्या आहारात काही प्रथिने   जोडायची आहेत,त्यांच्या आहारामध्ये डाळ ह्या पदार्थाचा समावेश करायला हवा.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे. सविस्तर: 1 . तूर डाळ: तूर डाळ , ज्याला अरहर डाळ म्हणूनही ओळखले जाते , कदाचित भारतीय पाककृतींमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डाळींपैकी एक आहे.पिवळी डाळ प्रथिन समृद्ध असते ,100 ग्रॅम शिजवलेल्या डाळीत सुमारे 22-30 ग्रॅम प्रथिने प्रदान करते.त्यात भरपूर आहारातील फायबर , लोह आणि फोलेट देखील असते , ज्यामुळे ते चांगले पचन आणि चांगली ऊर्जा यासाठी सर्वोत्तम बनते.तूर डाळीच्या हलक्या चवीमुळे ते जवळजवळ सर्व मसाले आणि भाज्यांसह मिसळणे सोपे होते आणि म्हणूनच ते तुमच्या आहारात भर म्हणून एक चांगला पर्याय आहे. 2 . मूग डाळ (हिरवे मूग): ...

मानसिक ताकद महत्त्वाची

ब्लॉग नं. 2025/154

दिनांक :- 4 जून,  2025.

मित्रांनो,

असं म्हटलं जातं की मानसिक ताकद हा जीवनाचा कणा आहे.आजच्या तणावग्रस्त आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत मानसिक ताकद ही एक महत्त्वाचे कौशल्य बनले आहे. मानसिक ताकद म्हणजे संकटांचा सामना करताना खंबीर राहण्याची क्षमता.ही फक्त कठीण प्रसंगांमध्ये सकारात्मक राहण्याचे नाव नाहीतर परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेण्याची कुवत आहे.आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की, मानसिक ताकद म्हणजे काय? मानसिक ताकदीचे महत्व, मानसिक ताकद कमी होण्याची कारणे? आणि मानसिक ताकद सुधारण्यासाठी करावयाचे उपाय जाणून घेणार आहोत.          

मानसिक ताकद म्हणजे काय?

           मानसिक ताकद म्हणजे मानसिक ताणतणावभीतीअपयशकिंवा अडचणींना तोंड देत स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनवणे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मानसिक ताकद महत्वाची भूमिका बजावते. मात्रकाही गोष्टी मानसिक ताकदीवर प्रतिकूल परिणाम करतात. 

मानसिक ताकदीचे महत्त्व: 

1. अपयशावर मात करण्यासाठी मदत:   मानसिक ताकद असल्यास अपयशाला तोंड देण्याची क्षमता विकसित होते.अपयश हे पुढील प्रयत्नासाठी शिकवणूक असते आणि यशाची पायरी असते.   

2. सकारात्मक दृष्टिकोन:  मानसिक ताकद कठीण काळातही सकारात्मक राहण्यासाठी मानसिक ताकद मदत करते. 

3. तणावावर नियंत्रण:  जीवनातील अनिश्चिततेचा सामना करताना तणाव कमी करण्यासाठी हे एक महत्त्वाचे  कौशल्य आहे. 

मानसिक ताकद कमी होण्याची कारणे: 

1. अतिप्रेशर आणि स्पर्धा:  आजच्या काळात व्यक्ती सतत स्पर्धेत असतो. प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम होण्याचा दबाव मानसिक थकवा आणतो. 

2. नकारात्मक विचारसरणी:   स्वतःकडे कमीपणाने पाहणेसतत नकारात्मक विचार करणे किंवा स्वतःला कमी लेखणे यामुळे मानसिक ताकद कमी होते. 

3. ताणतणावाचा अतिरेक:  सततच्या तणावामुळे मनावर विपरीत परिणाम होतो. त्याचा दीर्घकालीन परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. 

4. संवेदनशीलता:  लहानसहान गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देणे किंवा प्रत्येक गोष्टीत दोष पाहणे यामुळे मानसिक स्थैर्य बिघडते. 

5. सोशल मीडियाचा प्रभाव:  सतत सोशल मीडियावर असलेली "परफेक्ट" आयुष्यांची तुलना आपल्यात न्यूनगंड निर्माण करते. 

मानसिक ताकद सुधारण्यासाठी उपाय: 

1. सकारात्मक विचारांचा अवलंब:  नकारात्मक विचार टाळा. कोणत्याही परिस्थितीत चांगल्या गोष्टी शोधा. 

दिवसाची सुरुवात सकारात्मक विधानांनी करा. उदाहरणार्थ, "मी या आव्हानाचा सामना करू शकतो." 

2. ध्येय निश्चित करा:  लहानसहान आणि वास्तववादी ध्येय ठेवा. प्रत्येक लहान यश तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते. ध्येयाकडे वाटचाल करताना वेळोवेळी स्वतःचा आढावा घ्या. 

3. आत्मविश्वास वाढवा:   स्वतःवर विश्वास ठेवा.आपल्या क्षमता आणि मर्यादा ओळखा आणि त्यानुसार कृती करा. 

4. ताणतणाव व्यवस्थापन:   ध्यानयोगासने किंवा प्राणायामासारख्या तंत्रांचा सराव करा. विश्रांती घेण्यासाठी वेळ काढा. 

5. सुदृढ शरीरसुदृढ मन:  नियमित व्यायाम मनातील निगेटिव्हिटी कमी करून आनंद वाढवतो. पोषणमूल्ययुक्त आहार मानसिक आरोग्य सुधारतो. 

6. समस्या समजून घ्या:   समस्या लपवण्याऐवजी त्यांचा सामना करा. त्यासाठी मदत मिळवामग ती मित्रांची असो किंवा तज्ञांची. कठीण प्रसंगांमध्ये धीराने विचार करा. 

7. चांगले वाचन आणि प्रेरणा:   प्रेरणादायी पुस्तकं वाचा.अशा लोकांसोबत रहा जे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतात. 

8. सोशल मीडिया वापर मर्यादित करा:   सोशल मीडियावरील अनावश्यक गोष्टींवर जास्त वेळ घालवणे टाळा. 

वास्तविक जीवनातील लोकांसोबत जास्त वेळ घालवा. 

9. जिज्ञासू राहा:  नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. नवीन कौशल्य आत्मसात केल्याने आत्मविश्वास वाढतो. 

10. वेळेचे व्यवस्थापन:  प्राधान्यक्रम ठरवा. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अनावश्यक ताणतणाव टाळता येतो. 

मानसिक ताकद असलेल्या लोकांच्या काही सवयी: 

1. ते तक्रारी करत नाहीत:   कठीण प्रसंगांतही ते तक्रारीऐवजी उपाय शोधतात. 

2. स्वतःला जबाबदार धरतात:  चुकांची जबाबदारी घेतल्याने सुधारणा करण्याची क्षमता विकसित होते. 

3. संतुलन राखतात:  मानसिक ताकद असलेले लोक भावनांना आवर घालून कृती करतात. 

4. स्वतःसाठी वेळ काढतात:   त्यांनी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी वेळ दिला तरच ते इतरांसाठी काही करू शकतातहे त्यांना माहीत असते. 

समारोप:

मानसिक ताकद ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ही ताकद काही जन्मतःच येत नाहीतर ती सरावाने आणि योग्य दृष्टिकोनाने मिळवता येते. जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठीताणतणाव कमी करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी मानसिक ताकद आवश्यक आहे.आजच सकारात्मक विचारताणतणाव व्यवस्थापनआणि स्वतःवर विश्वास ठेवण्यास सुरुवात करा. कारण खंबीर मन असले की कोणतीही अडचण तुम्हाला पराभूत करू शकत नाही. 

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.   


Comments

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...