Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

महाकुंभला जाताय? मग हा ब्लॉग वाचूनच जा.

 ब्लॉग नं.2025/046  

दिनांक: 15 फेब्रुवारी,2025. 

मित्रांनो,

            प्रयागराग,अयोध्या आणि वाराणसी अशी तीन दिवसांची आणि जाणं-येणं धरून 5 पाच दिवसाची यात्रा आटोपून आम्ही नागपूरला परतलो.आम्ही दोघं पुण्याहून, माझा मधला भाऊ-त्याची पत्नी असे दोघे नागपूरहून आणि माझा धाकटा भाऊ,त्याची फॅमिली असे चार जण मिळून आम्ही नागपूरहून निघायचं ठरवलं.पुण्याहून आणि हैदराबादहून जरी प्रयागराग,अयोध्या आणि वाराणसी ही तिन्ही ठिकाणे दूर वाटतं असली तरी,नागपूरहून त्यामानाने जवळ आहेत. म्हणून आम्ही नागपूरहून एकत्र निघायचं ठरवलं.

सविस्तर:

            नागपूरहून सुभेदार ट्रॅवलर्सची एक 13 सीटर ट्रॅवलर बूक केली. इतक्या दूरच्या प्रवासासाठी जरी ती आरामदायक नाही, तरी 200-250 किमी पर्यन्त जायला हरकत नाही,असा विचार केला.नागपूर तो रिवा या जवळपास 11.30 तासाच्या प्रवासात,प्रत्यक्षात तो तेवढा नाही 9.25 तासांचा आहे.पण thanks टू महाराष्ट्र अँड मध्य प्रदेश पोलिस जे पैसे कमविण्याचे हे चांगले साधन आहे,असे समजून त्या रस्त्यात 5 ठिकाणी तंबू ठोकून बसले होते,जे एंट्री टॅक्सच्या नावाने पैसे मागत होते आणि त्याची पावती देण्यास तयार नव्हते.आणि ते देखिल गाडीची सारी कागदपत्रे व्यवस्थित होती.मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे परमीट आधीच काढलेले होते.केंद्रीय परिवहन मंत्री मा. नितीन गडकरी हे नेहमी चार तासात इथून तिथे वगैरे घोषणा करत असतात. त्यांनी या मार्गावर एखाद्या खासगी वाहनातून जाऊन जरूर अनुभव घ्यावा.

रिवा येथे रहाण्याचे कारण:

            प्रयागराजच्या जवळपास पोहोचल्यावर शहरात पोहोचण्यास वेळ लागत होता आणि नागपूरहून ते अंतर कापण्यास अधिक वेळ लागणार होता. म्हणून रिवा येथे Hotel Riwa Rajvilas येथे आम्ही थांबलो होतो.हॉटेल अतिशय भव्य आहे,हॉटेलचे सोबतच त्यांचा डायनिंग हॉल असल्याने,जेवायला कुठे जावे लागत नाही. तिथे डबल बेड रूम तेव्हा रु. 3500/- per night प्रमाणे मिळाली. डायनिंग हॉलमध्ये सुद्धा अगदी माफक दर आहेत. Hotel Riwa Rajvilas हे रिवा येथील महाराजांचे वंशज असलेल्यांचे शानदार हॉटेल आहे,त्याचा लुक अगदी राजेशाही वाटतो. गाडी पार्क करण्यासाठी मुबलक पार्किंग उपलब्ध आहे. प्रयागराज येथे आम्ही हॉटेल बूक केले नाही. कारण बऱ्याच हॉटेलमध्ये जवळपास पार्किंगची सोय तेव्हा उपलब्ध नव्हती.

अयोध्येत रहाण्याचे ठिकाण:         

            अयोध्येत शहरापासून दूर हायवेवर Hotel Royal Heritage येथे आम्ही 1 दिवस मुक्काम केला. हे हॉटेल देखिल खूप छान आणि आरामदायक होते.या हॉटेलला देखिल डायनिंग हॉल सोबतच होता.या हॉटेल मध्ये डबल बेड रूम तेव्हा रु. 5000/- per night प्रमाणे मिळाली.येथून मंदिर बरेच लांब असल्याने 4 सीटर ऑटोरिक्शाने अयोध्येतील बावडी सर्कल येथून पायी चालत जावे लागते, ई-रिक्शा मिळते,पण त्या कमी आहेत.हे अंतर 1-1.50 किमी सांगत असले तरी चालल्यावर लक्षात आलं की ते जास्त आहे.आंत गेल्यावर मुख्य रस्ता लागतो. तिथे रस्त्याच्या मधोमध बॅरीकेड टाकून दर्शन मार्ग बनविला आहे. त्या रस्त्याने  थेट मंदिरात जाता येते किंवा हनुमान गढीचे दर्शन घेऊन मग आंत जाता येतेगर्दी खूप असल्याने सगळे लोक हनुमान गढी बाय पास करून थेट मंदिरात जात होते. परत येतांना याच रस्त्यावर तुम्ही खरेदीचा आनंद घेऊ शकता.चपला जोडे,मौल्यवान वस्तु याची सोय मंदिरातच प्रशासनाने केली असल्याने त्याची चिंता येथे नाही.

वाराणसी येथील रहाण्याचे ठिकाण:     

            वाराणसी येथे आम्ही Hotel Radiance Courtyard   मुक्काम केला. हे हॉटेल देखिल छान होते आणि आरामदायक होते. तिथे डबल बेड रूम तेव्हा रु. 3500/- per night प्रमाणे मिळाली. येथे सकाळी ब्रेकफास्ट complimentry होता. येथून मंदिर पाच एक किमी वर होते. आमची गाडी तिकडे जाऊ शकत नसल्याने आम्ही येथे देखिल 4 सीटर ऑटोरिक्शाने शहरात आणि पुनः एका सायकल रिक्शाने मुख्य चौकात पोहोचलो.हा सायकल रिक्शाचा खर्च वाचवायचा असेल तर चालावं लागतं आणि गर्दीत चालणं त्रासदायक वाटतं.

समारोप:

1.       आम्ही सगळी हॉटेल ऑनलाइन बूक केलीत आणि ती देखिल हॉटेलच्या थेट नंबर वर संपर्क करून,कुठल्याही ट्रॅवल एजन्सि (MMT) वगैरेचा सपोर्ट घेतला नाही.

2.       ही हॉटेल्स कुणीही आम्हाला सुचविली नव्हती आणि गूगल रेटिंग पाहून हॉटेल्स निवडलीत.

3.       मध्य प्रदेश काय किंवा उत्तर प्रदेश काय, दोन्ही राज्यात कुठेही जेवण्यासाठी धाब्याशिवाय जेवणाची सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत,स्नॅक्सची देखिल वानवा असल्याने,सोबत स्नॅक्स आणि इतर खाण्याचे पदार्थ भरपूर घेऊन जावे.नाही तर भुकेले राहायची वेळ येऊ शकते.

4.       रस्त्यावर वाहन अडविणाऱ्या पोलिसांशी ड्रायवर ऐवजी स्वतः बोला आणि पावती फाडत असेल तर आणि तरच पैसे द्या.

5.       आपल्या गाडीचे सर्व कागदपत्र विशेषतः pollution कंट्रोल चे प्रमाणपत्र आहे कां? पार्किंग लाइट वगैरे सुरू आहेत आणि गाडी एकदम आहे,हे पाहूनच प्रवासाला निघावे. कारण हाच पैसा कमवायचा मार्ग आहे, असे समजून वागतांना दिसतात.

6.       मध्यप्रदेश शासनाने उभारलेले काही उपहारगृह रस्त्यावर आढळतील पण ते तुरळक आहेत.

7.       युपीआय सगळीकडे चालत नाही,थोडी कॅश असू द्या,जर कुठेही अगदी छोट्या प्रमाणात खरेदी करायची असल्यास.

महाकुंभ 26 पर्यन्त आहे. उद्यापासून कदाचित गर्दी कमी होईल. पण दिवसही फक्त दहा उरलेत.. त्यामुळे

जे अंजपावेतो गेलेले नाहीत,ते जायचा विचार करून शकतात.आणि पुनः एकवार गर्दी होऊ शकते. म्हणून आम्ही “महाकुंभ 144 एकदा होणार तेव्हा गर्दी तर होणारच आहे.” हे मनाशी पक्क ठरवून गेलेलो,तसं ठरवून निघा आणि मी वर दिलेल्या सूचना,निघायच्या आधी पुन्हा एकदा वाचून घ्या. यात्रेसाठी शुभेच्छा.हर हर महादेव आणि जय श्रीराम.                                                                                                                                     

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा आणि एक जागरूक रहा. 

 

प्रसाद नातुपुणे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...