Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

Blog No.2025/050. 

Date: -19th, February,2025 

मित्रांनो,

            कालच मी “छावा” या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील हिन्दी चित्रपटाविषयी ब्लॉग लिहिला त्या महान योध्याला ज्यांनी जन्म दिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,यांचा जन्म आज झाला. आज त्यांची जयंती.लाखोंचा पोशिंदा आजच्या पवित्र दिनी जन्माला आला.आपले बुद्धी चातुर्य,युद्ध चातुर्य,पराक्रम, स्वाभिमान,आत्मविश्वास या असंख्य गुणांच्या भरवश्यावर ज्यांनी हिंदवी साम्राज्याची स्थापना केली.त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वहाण्यासाठी हा माझा आजचा ब्लॉग.

सविस्तर:

            छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन भलेही निवडणुका जिंकता येतील,पण त्यांनी जे सुराज्य स्थापन केलं होतं,त्यामागची महाराजांची दृष्टी आजच्या किती राजकारण्यांकडे आहे.प्रजाहितदक्ष राजा असा लौकिक त्यांना उगीच प्राप्त झाला नव्हता.त्यांची दूरदृष्टी ही त्यांनी उभारलेल्या नौदलातून दिसून येते.त्यांच्या मुत्सद्देगिरीचा परिचय त्यांच्या चरित्रातून वारंवार दिसून येतो.

            त्यांचे निरीक्षण किती जबरदस्त होतं,हे आग्र्याहून सुटकेसाठी त्यांनी केलेल्या नियोजनावरून स्पष्ट होतं.

त्यांना आपल्या अधिपत्याखालील आणि एकंदरीतच प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती होती.आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने,त्यांनी थोडया फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल फौजा आणि आदिलशाही फौजांचा केवळ यशस्वीपणे सामना केला नाही,तर त्यांना थोपवून धरलं, त्यांच्यावर विजय मिळविला.राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी ऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले आणि राज्यकारभार अधिक सुलभ केला.

            छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुन: स्थापित केली.त्यांनी शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले.त्यांनी राज्य कारभारासाठी स्थापन केलेले 8 मंत्री असलेले अष्टप्रधान मंडल त्यांच्यातील द्रष्टेपणाची साक्ष देतात. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि अनेक किल्ले जे सामरिक दृष्ट्या महत्वाचे होते,अशा किल्ल्यांवर ताबा मिळविला.   

समारोप:

            छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिता खूप येईल,पण त्यांच्या विषयी माहित नाही असा मराठी माणूस विरळाच.भारतात इतरत्र जेव्हा इतर राजे आपले राज्य टिकविण्यासाठी,प्रसंगी मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारायला तयार होते किंवा स्वीकारत होते.तेव्हा महाराष्ट्रात किंबहुना अखिल भारतात छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे योध्ये महापुरुष उदयास आले.ज्यांनी प्राणपणाने लढून मुघलांचे दास्यत्व न स्वीकारता आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघलांच्या झेंड्याला महाराष्ट्रात येण्यास नाकारले.असं म्हटलं जातं की हिंदू धर्म जिवंत राह्यला,तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आणि त्या वेळेसच्या विशेषतः औरंगजेबाची मानसिकता विचारात घेतली,तर मला या कथनात कुठेही अतिशयोक्ति वाटत नाही. आज त्यांच्या जयंती दिनी त्यांना मानाचा मुजरा.   

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 


प्रसाद नातु, पुणे. 

Comments

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...