ब्लॉग नं. 2025/002
दिनांक:- 2 जानेवारी,2025.
मित्रांनो,
नुकतेच,म्हणजे साधारण आठ दिवस झाले,समजून घ्यायला हवं,या शीर्षकाखाली एक लेख वाचायला मिळाला. हा लेख निवृत्त न्यायधीश मृदुला भाटकर यांनी लिहिलेला होता. बंगळुरू येथील एका खासगी कंपनीतील एआय अभियंता आणि उपमहाव्यवस्थापक अतुल सुभाष, (Atul Subhash) वय वर्ष 34 यानी 9 डिसेंबर 2024 रोजी दुर्दैवीरित्या आत्महत्या केली. या संबंधातील हा लेख विचार करायला लावणारा आहे.आजपर्यंत आपण नवऱ्याच्या अत्याचाराच्या गोष्टी ऐकत आलो आहे,पण बायको आणि तिच्या माहेरच्या लोकांच्या जांचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे त्यानेच लिहून ठेवले आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करू.
सविस्तर:
या
बाबत नेमकं काय घडलं हे आधी बघूया.बंगळुरू येथील एका खासगी कंपनीतील एआय अभियंता
आणि उपमहाव्यवस्थापक अतुल सुभाष, वय वर्ष 34 यानी 9 डिसेंबर 2024
रोजी
दुर्दैवीरित्या आत्महत्या केली. त्यानी 24 पानांचे
विस्तृत पत्र आणि एक व्हिडिओ मागे ठेवला असून, त्यामध्ये त्याच्या विभक्त
पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांकडून गंभीर छळ होत असल्याचा आरोप
केला आहे.
सुभाष यानी आपल्या
पत्रात लिहिले आहे की,
त्याच्या पत्नीने त्याच्यावर खोट्या आरोपांचे अनेक खटले दाखल केले,
ज्यामध्ये खून, घरगुती हिंसाचार, हुंडाबळी आणि आर्थिक शोषण यांचा समावेश आहे. तसेच, एका
न्यायाधीशाने प्रकरण निकाली काढण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानी
पत्रात नमूद केले की, खटले मागे घेण्यासाठी त्याच्या पत्नी
आणि सासरच्यांनी ₹ 3 कोटींची मागणी
केली होती,
तसेच त्यांच्या मुलाला भेटण्याचा अधिकार मिळवण्यासाठी अतिरिक्त ₹ 30 लाख देण्याची मागणी केली होती. सततच्या कायदेशीर संघर्षांमुळे तो मानसिक
आणि शारीरिकदृष्ट्या थकले असल्याचे त्यानी व्यक्त केले. कोर्टातील सुनावणी दरम्यान
सासरच्या लोकांकडून त्याची चेष्टा होत असल्याचेही त्यानी नमूद केले.
सुभाष यांच्या
मृत्यूनंतर बंगळुरू पोलिसांनी गुरुग्राम, हरियाणा येथून निकिता सिंघानिया
आणि प्रयागराज, उत्तर प्रदेश येथून तिची आई व भाऊ यांना अटक
केली. त्यांना बंगळुरूला आणून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.सुभाषच्या
दुर्दैवी मृत्यूनंतर समाजात प्रचंड संताप व्यक्त होत असून, पुरुषांच्या
हक्कांबद्दल आणि कायदेशीर प्रणालीच्या न्याय्यतेबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
नेटिझन्सने न्यायाची मागणी करत निकिताची कंपनी अॅक्सेंचरने तिच्याविरुद्ध कारवाई
करण्याची विनंती केली आहे.या घटनेने वैवाहिक वादांमध्ये व्यक्तींना येणाऱ्या
भावनिक आणि कायदेशीर अडचणींचे वास्तव समोर आणले असून, अशा
संवेदनशील प्रकरणांवर न्याय्य आणि संतुलित दृष्टिकोनाने विचार करण्याची मागणी केली
जात आहे. तसेच काही गटांकडून स्त्रियांना खूप जास्त अधिकार प्रदान करण्यात आले आहे,त्यावर
फेरविचार करण्याची मागणी होत आहे.
प्रत्यक्षात पाह्यला गेले
तर हा कायद्याचा प्रश्न नसून हा एक सामाजिक प्रश्न झाला आहे,मानसशास्त्राचा प्रश्न
झाला आहे.आज छोट्या छोट्या गोष्टीतून प्रकरणे घटस्फोटापर्यन्त जाऊन पोहोचली आहेत.लग्नाची
आणि जोडीदाराची संकल्पना बदलली आहे.बायको कशी असावी किंवा नवरा कसा असावा याचा विचार
केला जात नसून,फक्त व्यवहाराकडे बघितले जात आहे.मला कल्पना आहे की हे थोडे धारिष्टय
करतोय मी,पण प्रेमविवाहात देखिल प्रेम कुठे राहयलं आहे असं वाटतं नाही. कारण जेव्हा
अरेंज्ड विवाह हा बरा ही समजूत समाजात पसरत चालली आहे. त्यावरून हा निष्कर्ष आपण काढू
शकतो.
एखादे प्रकरण कुठे घडले
म्हणून स्त्रीचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांचा पुनर्विचार व्हावा म्हणणे योग्य नाही.
कारण स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी झालेले नाही.पण
या अतुल सुभाष प्रकरणातून कुठेतरी स्त्रीचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांचा गैरवापर झाला असल्याचे दिसून येते. याला कुठे तरी प्रतिबंध घालायला
हवा. हे काम वकील,पोलिस आणि न्यायधीश हे करू शकतात.कुठे तरी ही न्याय देणारी प्रणाली
कमी पडते आहे हे दिसून येतं.याचाच अर्थ अतुल सुभाष हा कायद्याचा बळी आहे.कारण अतुल
सुभाषला समजून घेण्यात वकील,पोलिस आणि न्यायधीश ही मंडळी कमी पडली असे वाटायला जागा
आहे.याला कारण हे देखिल म्हणता येईल,नवऱ्याच्या अत्याचाराच्या घटनांचा या सर्वांवर
भडिमार झाल्यामुळे,यांच्यापैकी काही जणांकडून पूर्वग्रह दूषित नजरेतून अजाणतेपणे विचार
केला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ती देखिल माणसंच आहेत.
समारोप:
या प्रकरणामुळे असं वाटू शकतं की स्त्रीचे संरक्षण करणाऱ्या
कायद्यांचे स्वरूप देखिल दुधारी तलवारी सारखे झाले आहे आणि ते दोन्ही प्रकारे वापरले
जाऊ शकतात.म्हणजेच स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा पुरुषांचा
छळ
करण्यासाठी. तसे व्हायला नको,याची काळजी घेतली पाहिजे.नाही तर स्त्री अत्याचाराच्या
प्रत्येक केसकडे तसे पाहीले जाण्याची शक्यता आहे.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर
लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
खूप छान लिहिलात. खरंतर मुलगकाय किंवा मुलगी काय, दोघांचं संगोपन करताना एकच ट्रीटमेंट दिली पाहिजे. दोघांना पण त्यांचं आयुष्यातलं आयुष्य व त्यातल्या अडचणी तोंड देण्याची क्षमता निर्माण करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येक पालकाला अपत्त्याला जन्म देण्यापूर्वी संगोपनाचे प्रशिक्षण देण्याची अत्यंत गरज आहे
ReplyDeleteसरळ गावं सोडून जाने व गायब होणे, एक वर्षे - best पर्याय
ReplyDelete