Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

C-KYC म्हणजे काय?

 Blog No. 2023/131 

Date: 26th, May 2023.

 

मित्रांनो,

            तुमचं एका बँकेत अकाऊंट आहे. तिथे अकाऊंट उघडतांना तुम्ही केवायसी डॉक्युमेंट दिलेत.नंतर तुम्ही म्यूचुअल फंड अकाऊंट दुसऱ्या बँकेत उघडले.तिथे तुम्ही केवायसी डॉक्युमेंट दिलेत.नंतर तिसऱ्या बँकेत फिक्स्ड डिपॉजिट वरचा व्याजाचा दर अधिक म्हणून तिथे फिक्स्ड डिपॉजिट अकाऊंट उघडले,तिथे तुम्ही केवायसी डॉक्युमेंट दिलेत. पण आता हे करायची गरज भासणार नाही.कारण आता CKYC हे Central Know Your Customer मुळे हे शक्य होणार आहे. ही सर्व काय प्रोसेस आहे. हे आपण बघूया. 

 

सीकेवायसी म्हणजे काय?

            CKYC हे Central Know Your Customer चे संक्षिप्त स्वरुप आहे.यासाठी एक केंद्रीकृत भांडार (सेंट्रल सर्व्हर) स्थापित करण्यात आले आहे.जे ग्राहकाचे सर्व वैयक्तिक तपशील संग्रहित (Save) करते. यापूर्वी, प्रत्येक आर्थिक संस्थेसाठी स्वतंत्र केवायसी प्रक्रिया होती.हे सर्व सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकारने सीकेवायसी सुरू केले.KYC प्रक्रिया एकाच व्यासपीठावर आणणे शक्य झाले आहे.

त्यामुळे, जर एखाद्या गुंतवणूकदाराची संपूर्ण सेंट्रल केवायसीची चौकशी झाली असेल,आणि त्याला इतर वित्तीय संस्थेत गुंतवणूक करायची असेल तर.त्याला पुन्हा त्याच प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही.कारण डेटा एका सेंट्रल सर्व्हरमध्ये डिजिटल पद्धतीने संग्रहित केला असेल.हा डेटा सर्व अधिकृत वित्तीय संस्थांना उपलब्ध आहे. वित्तीय संस्था आवश्यकतेनुसार डेटा वापरू शकते.

CKYC रजिस्ट्री आणि त्याचे व्यवस्थापन हे सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन आणि अॅसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटीज इंटरेस्ट ऑफ इंडिया (CERSAI) यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सीकेवायसीची घोषणा 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती.पण त्याची अंमलबजावणी  जुलै 2016 मध्ये सुरु झाली. केंद्रीय केवायसी किंवा सीकेवायसी हा सर्व वित्तीय संस्थांच्या केवायसी प्रक्रियेला एका खिडकीखाली आणण्यासाठी सरकारचा एक उपक्रम आहे. CKYC नियमानुसार सर्व वैयक्तिक गुंतवणूकदारांनी KYC आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे.

CKYC ची वैशिष्ट्ये

CKYC नोंदणी ग्राहकाविषयीची सर्व संबंधित माहिती एकाच खिडकीखाली उपलब्ध करून देते. यामुळे बराच वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होते.सीकेवायसी सुरू होण्यापूर्वी,बँक खाते उघडणे ही एक परीक्षा होती.आर्थिक संस्थेच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करावी लागत असे.यासाठी खूप वेळ लागत असे.एवढेच नव्हे तर दुसऱ्या वित्तीय संस्थेत गुंतवणूक करायची असेल,तर पुन्हा कागदपत्रांच्या त्याच प्रक्रियेतून जावे लागत असे.म्हणून, CKYC सुरू केल्यावर,ग्राहकाला पुनः पुनः प्रक्रिया करायची गरज उरली नाही.डेटा एकाच छताखाली साठवला जातो.हा डेटा अधिकृत वित्तीय संस्थांकडे उपलब्ध आहे. हे ग्राहक आणि वित्तीय संस्था दोघांनाही कागदपत्रांचा त्रास टाळण्यास मदत करते.

 

सीकेवायसीची खालील वैशिष्ट्ये आहेत

1.       CKYC हा 14 अंकी क्रमांक आहे,जो ग्राहकाच्या आयडी पुराव्याशी जोडलेला आहे.

2.      त्यानंतर डेटा सुरक्षितपणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संग्रहित केला आहे.

3.      सबमिट केलेला दस्तऐवज नंतर सत्यापित (verified) केला आहे.

4.     जेव्हा केवायसी तपशीलांमध्ये बदल होतो तेव्हा सर्व संबंधित संस्थांना सूचित केले जाते.

 

 

सीकेवायसी कसे कार्य करते?

तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी केंद्रीय केवायसी पूर्ण करणे आता अनिवार्य झाले आहे. हे ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास आणि गुंतवणुकीला अधिक सुरक्षित करण्यात मदत करते. वित्तीय संस्था ग्राहकांचे केवायसी रेकॉर्ड जतन करते.यामुळे आर्थिक क्षेत्रातील कोणतीही फसवणूक आणि संशयास्पद वर्तन रोखण्यात मदत होते.कोणत्याही वित्तीय संस्थेत गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकाला केवायसी फॉर्म भरावा लागतो. सीकेवायसी फॉर्म संबंधित कागदपत्रांसह भरणे आणि सबमिट करणे आवश्यक आहे.  

CERSAI पुढे KYC कागदपत्रांची पडताळणी करते. CERSAI द्वारे सत्यापित केलेले KYC दस्तऐवज डिजिटल पद्धतीने एका सर्व्हरमध्ये संग्रहित केले जातात. ग्राहकाला 14 अंकी क्रमांक दिला जातो जो त्याच्या ओळखपत्राशी जोडलेला असतो.हा क्रमांक केवायसी सत्यापित क्रमांक असेल.प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ग्राहकाला इतर वित्तीय संस्थेत गुंतवणूक करायची असल्यास त्याला पुन्हा केवायसीसाठी विचारले जाणार नाही.वित्तीय संस्था  CERSAI ला CKYC क्रमांक देऊन ग्राहकाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची विनंती करू शकते.अशा प्रकारे संग्रहित केलेला डेटा सर्व अधिकृत वित्तीय संस्थांसाठी उपलब्ध  आहे. वित्तीय संस्था आवश्यकतेनुसार डेटा वापरू शकते.

            C-KYC नोंदणी कशी करावयाची, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, CKYC चे फायदे काय हे आपण बघणार आहोत.उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 

प्रसाद नातु,पुणे.    

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...